मा. एक_वात्रट,

वरील लिखाण वाचून, हे सगळं आरक्षणाचं कटकारस्थान मागासवर्गियांनी इतर उच्चवर्णीयांबाबत मनात द्वेषभावना ठेवून त्यांना ठेचण्यासाठी केलं आहे असा आपला समज झालेला दिसतो. आरक्षण हे सरकारने केले आहे, मागासवर्गीय लोकांनी नाही, त्यांनी तर ते मागितले देखील नव्हते. उलट त्यापैकी कित्येकांचा त्याला विरोधच आहे (माझे कित्येक मागासवर्गीय मित्र याला साक्ष आहेत.)हे आपल्याला माहित नाही काय? तरीही आपण असे मागासवर्गीयांची टर उडवणारे लिखाण कसे करू शकता?

या चर्चेत कोणाची टर उडवली आहे? सर्वसाक्षींनी जे लिहिले त्यात गैर काय?

मागासवर्गीय हा शब्द वापरला, म्हणजे काय लगेच टर उडवली असे झाले का? सरकारच हा शब्द वारंवार वापरते.

नुसते आरक्षण म्हटले तर काय कळणार बरे? कोणासाठी आरक्षण हे कसे कळणार. म्हणुन स्पष्ट उल्लेख केला की हे आरक्षण मा.व. साठीच आहे.

नाहीतर घोळ व्हायाचा...उगाच कोणाच्या डोक्यात आले की हे आरक्षण "सवर्णांसाठी "आहे , कारण ते एका सवर्णाने मागितले आहे.  तर??

आणि अगदी तुम्ही म्हणता तसे टर उडवणे असेल तर ते सुध्दा सरकारचीच टर उडवणे असे दिसतेय. मागासवर्गाची नव्हे.

आपण उगाच "रोख" व्यक्तिशः मागासवर्गीयांकडे वळवत आहात असेच दिसतेय.

सर्वसाक्षींनी जी मागणी केली ती अवास्तव आजिबात वाटत नाही.  वर नमुद केलेल्या क्षेत्रांची आर्थिक उलाढाल आणि व्यापकता बघता, या क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध होऊ शकतात.  हे आपण नाकारू शकत नाही.

आता विषय आपल्या मा.व. मित्रांबाबत. तर हे अतिशय चांगले उदा. आहे.  तुमचे नी तुमच्या मित्रांचे अभिनंदन!!

(एक विनंती, शक्य झाल्यास त्यांच्या तर्फ़े सरकारच्या डोळ्यात अंजन पडेल असे काही कृत्य करता येईल का ? हे पहावे. उदा. एखादे पत्र त्यांचे सहीनीशी.

फ़ार उपयोग होणार नाही हे गृहीतच धरतोय, पण "प्रयत्ने कण रगडीता वाळूचे...." काय हरकत आहे?!)

असे का? यावरून मागासवर्गीय सामान्य दर्जाचे आहेत असे आपण सुचवत आहात काय?

आजिबात नाही. आपणच नको तो अर्थ काढत आहात.

अहो, सगळ्याच क्षेत्रात मा. व. साठी नियम शिथील करतात ना! आपल्याच  सरकारचे धोरण !!

आपल्याला अमान्य आहे का? असल्यास कृपया उदा. देवु शकाल का?

हे वाक्य तर सरसकट चीड आणणारे आहे.एका ब्राह्मण लेखकाने (कथितरित्या) लिहिलेले वाक्य आपण सगळ्या मागासवर्गीय लोकांवर कसे थोपू शकता? असे म्हणण्यास मागासवर्गीय तयार होतील इतक्या खालच्या पातळीवर ते गेले आहेत काय?

सहमत. मलाही तेच ते काढणे आवडत नाही.

का?मागासवर्गीय भिकारी आहेत काय?

सहमत. पण आपल्या सरकारचे काही सांगता येत नाही. अहो, तुमच्या मित्रांना आणि त्यांचे सारखे इतर यांना आरक्षण नको आहे. तरी देखील सरकार देतच आहे की. "आखीर सरकार हैं भाई कुछ भी कर सकती हैं!" ;-)

कुठल्या मागासवर्गीयाने आपल्याकडे ही मागणी केली हे आम्हाला कळू शकेल काय?

माफ़ करा, मला स्वतःला असली उणीदुणी काढायला आवडत नाही. पण आपला सवाल आला म्हणुन हा प्रपंच...

पुण्याचीच कथा ...दांडेकर पूल, पर्वती, किंवा सिंहगड रोड दत्तवाडी इत्यादी परिसरात जी "सजावट" केली आहे ते पहाता जागेचा प्रश्न पुढे आला तर नवल नाही.

दत्तवाडीतीलच एक मोठी जागा, केवळ रिकामी म्हणून येथे लोकांनी डेरा टाकला, हळु हळु वाढ झाली. ती जागा सरकारने राखुन ठेवली होती "बागेसाठी" पण आज तेथे याच लोकांची वस्ती आहे. कारण ते लोक महापालिके कडे गेले नी आमची घरे कायदेशीर करा म्हणाले. बस्स! लगेच सरकारला पुळका आला नी सगळे कायदेशीर झाले.

ही कहाणी नाही. मी स्वतः तेथील व्यक्तिशी बोललो आहे जो या प्रकारात पहिल्यापासुन सहभागी होता. 

आता म्हणाल, लोकांना रहायला जागा नाही नी यांना बाग सुचतेय... म्हणु शकता ... पण दुसऱ्याच्या जागा बळकावणे यांना अगदीच अवगत आहे. हे लोक मागत सुध्दा नाहीत सरळ डेरा टाकतात.  

आपला आरक्षणाला विरोध आहे ना?

आहेच.

तो जरूर व्यक्त करा, पण त्यासाठी मागासवर्गीय लोकांवर का घसरता? त्यांचा अपमान का करता?

कोण घसरलेय? नुसते आरक्षण म्हटले तर काय कळणार बरे? कोणासाठी आरक्षण हे कसे कळणार. म्हणुन स्पष्ट उल्लेख केला की हे आरक्षण मा.व. साठीच आहे.

नाहीतर घोळ व्हायाचा...उगाच कोणाच्या डोक्यात आले की हे आरक्षणाची मागणी "सवर्णांसाठी "आहे की काय, कारण ते एका सवर्णाने मागितले आहे.  तर??

यात त्यांचा काय दोष?

सध्याचे सवर्ण भरडले जातात यात त्यांचा काय दोष.

असेही म्हणु शकतोच की आपण...

दोष असलाच तर तो संधीसाधू नि जनतेला भुलवणाऱ्या पुढाऱ्यांचा आहे.

हेच तर सांगण्याचा प्रयत्न आहे. मी, "आय आय टी त आरक्षण हवे?" अशी जी चर्चा सुरु केली होती , त्यात सुरुवातिला नी शेवटी मी हाच मुद्दा मांडला होता.

असो,

--सचिन