पाण्याची एकूणच टंचाई पाहता त्याने हात आखुडता घेण्याचे ठरवले आहे. बाकी पालथ्यांचे चालूदे.

कारण मी सुद्धा मागील एका चर्चेत अशा नाहक चर्चा बंद करा म्हणाल्यावर मला "तुम्ही वाचू नका हवंतर ", इतकेच काय पण "काय वाचावे" याचे सुद्धा अनाहूत सल्ले मिळाले.

सर्वसाक्षी, तुम्हाला हे सगळे नक्कीच ठाऊक असावे. तरीही मनोगतींकडून उत्तरांची अपेक्षा का?

मुळात सर्वसाक्षींनी कितीही निकोप म्हटले तरी ही चर्चा पूर्णतः एकांगी आहे आणि मुळीच निकोप नाही.

सरकारची इथे आरक्षण लावायची ताकद नाही असे मला वाटते. खेळ आणि चित्रपटांविषयी जनतेचे वेड लक्षात घेता तिथे कदाचित आरक्षणाला जबरदस्त विरोध होईल व तो अर्थव्यवस्थेवर नियंत्रण असणाऱ्यांचा असेल व त्यामुळेच हे धोरण सरकार राबवू इच्छीत नाही असा माझा रोख आहे.

याचा अर्थ , सर्वसाक्षींसारख्या तमाम भारतीयांना (उच्चवर्णीय!) नोकरी, शिक्षण इ. पेक्षा खेळ आणि चित्रपटांचा दर्जा महत्त्वाचा वाटतो असा घ्यावा का?

                                                     साती काळे.