<<याचा अर्थ , सर्वसाक्षींसारख्या तमाम भारतीयांना (उच्चवर्णीय!) नोकरी, शिक्षण इ. पेक्षा खेळ आणि चित्रपटांचा दर्जा महत्त्वाचा वाटतो असा घ्यावा का? >>

याचा अर्थ आरक्षणामुळे शिक्षण, नोकरी यांचा दर्जा खालवतो असे आपले मत आहे असा घ्यावा का?

कशाला उगाच वादासाठी वाद घालताय?

सरकारची इथे आरक्षण लावायची ताकद नाही असे मला वाटते. खेळ आणि चित्रपटांविषयी जनतेचे वेड लक्षात घेता तिथे कदाचित आरक्षणाला जबरदस्त विरोध होईल व तो अर्थव्यवस्थेवर नियंत्रण असणाऱ्यांचा असेल व त्यामुळेच हे धोरण सरकार राबवू इच्छीत नाही असा माझा रोख आहे.

या आपल्या लेखनावरूनच हे स्पष्ट होतय की तुमच्या मते (माझ्या नाही) जनतेला चित्रपट आणि राजकारण रोजीरोटी आणि शिक्षणापेक्षा महत्त्वाचे वाटतेय.

बाकी दिशाभूल करायला मुद्दा छान आहे. अर्थात ही संकल्पना आपली वा नवी नसल्याने आपल्याला फारसा दोष देण्यात अर्थ नाहीच.

या त्याच्या म्हणण्याशी सहमत.

मागासवर्गीय डॉक्टरचे रुग्ण मरतातच आणि मागासवर्गीय वैमानिकाचे विमान कोसळणारच हे अमित मोरे यांचे प्रतिपादनच तथाकथित उच्चवर्णीयांची मानसिकता स्पष्ट करणारे आहे.

आजच्या शहरी आधुनिक संस्कृतित वाढलेल्या, अस्पृश्यता म्हणजे काय हे कधीच पाहायला न मिळालेल्या मुलाना जातीची पहिली ओळख इथे होते. आपल्या वर्गातल्या मुलांची जात कधी विचारल्याचे मला आठवत नाही. कधी कुणी ए भटा अशी हाक मारली तर तो कधी 'जातीयवाद' वाटला नाही. पण जेव्हा प्रत्येक अर्जात जात व धर्म विचारला जातो तेव्हा प्रश्न पडतो की हाच का 'निधर्मी' देश?

खरं आहे, पण खरा भारत हा खेड्यात आहे आणि खेड्यात अजूनही शेंबड्या पोरालासुद्धा आपली जात आणि जातीव्यवस्थेतलं आपलं स्थान माहीत असतं. पण शहरात राहणाऱ्या लोकांना हे सांगून काय फायदा म्हणा?

पण खरंच, पाण्याची कमतरता असताना मी पाणी वाया का घालवतेय? तो प्रमाणे मी ही आत्तापासून पाणीबचत करण्यास सुरुवात करते. (पालथ्या)घड्यांचं चालू दे.

                                                    साती काळे.