चित्रपट ,कला क्षेत्राचा विचार करायला गेले तर पूर्वी या क्षेत्रात उच्च वर्णियांचाच कमी सहभाग होता कारण गाणे बजावणे हलक्या दर्जाचे मानले जायचे.पण या क्षेत्रात भास्करबुवा बखले यांचेपासून थेट भीमसेन जोशी यांच्यापर्यंत ब्राह्मणानी घर सोडून पळून जाऊन मुस्लीम गवयांची शागिर्दी करून अगदी त्यांची पानाची पिंक हातावर झेलून ती कला मिळवली .त्यातही ते गायक लहरी ! बम्मनके बच्चेको पढानेसे अपने बच्चेको तय्यार करेंगे म्हणून त्याच्याकडून हमाली करून घेऊन आपल्याच मुलाला चोरून शिकवणार अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यानी कला नुसती मिळवलीच नाही तर त्यात सर्वोच्च शिखर गाठले.रामजोशींचेही असेच.तमाशात जाण्यासाठी त्यानी घरादारावर पाणी सोडले. नाट्यक्षेत्रही असेच होते .कुलीन घराण्यातील स्त्रीने तर सोडाच पण पुरुषानी सुद्धा नाटकात जाणे म्हणजे पापच समजले जायचे.काहीच येत नसेल तर निदान नाटकात तरी जा असे म्हटले जायचें. नुकत्याच काळाच्या पडद्या आड गेलेल्या नौशाद याना घर सोडावे लागलेच होते आणि असेच कष्ट उपसावे लागले होते. शिवाय त्या क्षेत्रात जागा ठराविकच असे नाही ज्याच्यात/जिच्यात खरी कला आहे आणि कष्ट करण्याची तयारी आहे तो /तीतेथे स्थान निर्माण करू शकतो/ते
एका सुभाषितानुसार क्रियासिद्धिः सत्वे भवति महतां नो ऽपकरणे Iमला ही सोय मिळत नाही म्हणून मला शिकता येत नाही या सर्व गोष्टी सांगायच्या असतात. मध्यंतरी हृदयस्थ,बॅरिस्टरच कार्ट ,ताठ कणा आणि आमचा बाप आणि आम्ही अशी अनुक्रमे डॉ. नितु मांडके,डॉ हिम्मतराव बावस्कर डॉ.प्रेमानंद रामाणी आणिं डॉ.नरेंद्र जाधव या वेगवेगळ्या समाजातील पण आपल्या क्षेत्रात उच्चतम पदाला गेलेल्या व्यक्तींची चरित्रे, आत्मचरित्रे वाचावयास मिळाली त्यातून निष्कर्ष एकच काढता येतो तो म्हणजे तुम्ही कोणत्याही समाजात जन्माला आला असला तरी प्रगतीला फ़क्त एकच मार्ग असतो तो म्हणजे कठोर परिश्रम! सचोटी आणि चारित्र्य त्याचबरोबर आवश्यक आहे.नरेंद्र जाधव यांच्या वडिलांची एक आठवण सांगण्यासारखी आहे.एकदा काही कारणाने नरेंद्र याना रेल्वेचे तिकिट काढता आले नाही ही गोष्ट त्या पैश्यात त्यानी काहीतरी खरेदी करून आणल्यामुळे त्यांच्या वडिलांच्या लक्षात आली आणि वडिलानी त्यांची अशी खरड काढली की पुन्हा तसे करण्याची हिम्मत त्यानी केली नाही. आणि आता ५ डिसेंबरच्या आगेमागे मुंबईस जाणाऱ्या सर्व ट्रेनमधील प्रवाशांपैकी कोणीच तिकिट काढलेले नसते येवढेच काय ज्यानी अगाऊ आरक्षण केलेले असते अश्या प्रवाशाना ते रद्द करून प्रवासासाठी काहीतरी वेगळा पर्याय शोधावा लागतो. याचा पत्रलेखकाने प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे.