आजच्या हिंदी चित्रपट सृष्टीतील तारे तारका बघितले की एक लक्षात येईल की तिथे आरक्षण आहेच. आई, बाप, भाऊ, बहीण वा जवळचे नातेवाईक सिनेमात असतील तर तुम्हाला भरपूर संधी मिळते. अगदी डझनावारी चित्रपट कोसळले तरी पुनःपुनः कोणीतरी संधी देईल ह्यची खात्री ठेवा (उदा. अभिषेक बच्चन, इशा देवल) कुणाचा कुणी नसणारा नट जर दोनचार फ्लॉप चित्रपट देता झाला तर त्याला कुणी भीक घालणार नाही.
दाऊद, सालेम, छोटा मोठा राजन आदि स्मगलर महात्मे तर आपले रिझर्वेशन ठेवून आहेतच. त्यांच्याशी लागेबांधे असणारे लोक (उदा. नदीम) ह्यांना काम देण्याकरता ही मंडळी दबाव आणतात हे उघड गुपित आहे.
असल्या क्षेत्रात बीसी, ओबीसी आरक्षण आणले तरी फार वाईट होणार नाही. असो.