ब्राह्मणांच्या काही टक्के मुलीही (लग्नासाठी) मागास वर्गासाठी आरक्षित असाव्यात.
हे वाक्य तर सरसकट चीड आणणारे आहे.एका ब्राह्मण लेखकाने (कथितरित्या) लिहिलेले वाक्य आपण सगळ्या मागासवर्गीय लोकांवर कसे थोपू शकता? असे म्हणण्यास मागासवर्गीय तयार होतील इतक्या खालच्या पातळीवर ते गेले आहेत काय?
वरील लेखकाच्या वाक्यातील शब्दांवर न जाता आरक्षणाचे खूळ (लेखकच्या दृष्टिकोनातून) आता कुठल्याही थरालाही पोहोचू शकते हा भावार्थ लक्षात घ्यावा.
मागासवर्गीयांना पासेस देऊन त्यांच्या प्रत्येक खरेदीवर ३०% किमान सवलत द्यावी.
का?मागासवर्गीय भिकारी आहेत काय?
का? सवलत ही भीक असते का? चुकीचा शब्दच्छल करू नका.
राहण्याच्या जागेचा प्रश्न असेल तर सवर्णांना भारताबाहेर (शक्यतो पाकिस्तानात) हुसकावून मागासवर्गीयांना राहत्या जागा उपलब्ध करून द्याव्यात.
कुठल्या मागासवर्गीयाने आपल्याकडे ही मागणी केली हे आम्हाला कळू शकेल काय?
माझ्याकडेच काय पण अशा चर्चा सुरू करणाऱ्या, त्यात भाग घेणाऱ्या कोणाकडेही मागासवर्गीयांनी अशी मागणी केली नाही. राज्यकर्त्यांना (?????) मागासवर्गीयांचा जो पुळका येतो तो पाहता हेही अशक्य दिसत नाही.
एकूनच, आपण, उच्चवर्णीयांचे प्रतिनिधित्व आपल्याकडे आहे नि प्रत्येक मागासवर्गीय हा या देशाचा शत्रू, उच्चवर्णीयविरोधी, नि आरक्षण मागणारा आहे असे मानून सरसकट विधाने कशी करू शकता?
दुर्दैवाने मी उच्चवर्णीय आहे आणि ह्या चर्चेत भाग घेतो आहे त्या अर्थी मी त्यांचे प्रतिनिधित्व करतो आहे. हा गुन्हा ठरू शकतो असे आपण का सुचविता आहात?
कडवट प्रतिक्रिया देण्याचा फक्त मागासवर्गीयांनाच अधिकार आहे असे आपल्याला म्हणायचे आहे का? सर्वच मागासवर्गीय उच्चवर्णीयविरोधी आणि आरक्षण मागणारे नाहीत असा आपला दावा आहे. (वैयक्तिक पातळीवर तो खराही असेल) पण मागासवर्गीयांतून सार्वजनिकरीत्या आरक्षणाला विरोध करणारी चळवळ उभी राहिलेली दिसत नाही. मागासवर्गीय विचारवंत (त्यांच्यातही आहेत हा माझा विश्वास आहे) मागासवर्गीयांचे प्रबोधन करताना दिसत नाहीत. हिंदू-मुस्लिम वादात आपण हिंदूंच्या बाजूने बोलतोच की नाही? तेंव्हा ते प्रतिनिधित्व आपल्याला कोणी बहाल केलेले असते? मागासवर्गीयांच्या बाजूने जेंव्हा आपण कांही मुद्दे मांडता तेंव्हा मागासवर्गीयांचे प्रतिनिधित्वाची धुरा कोणी आपला खांद्यावर ठेवलेली असते?
आपला आरक्षणाला विरोध आहे ना? तो जरूर व्यक्त करा, पण त्यासाठी मागासवर्गीय लोकांवर का घसरता? त्यांचा अपमान का करता? यात त्यांचा काय दोष?
'लेले, पटवर्धन आणि गोखले जेंव्हा चतुर्थश्रेणीत येतील आणि ऑफिसात झाडू मारताना दिसतील तेंव्हाच आमच्या आत्म्याला शांती लाभेल' हे वाक्य म्युन्सिपालटीच्या कचेरीत काम करणाऱ्या मागासवर्गीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या युनियन लीडरचे आहे. त्यावर बाकीच्या उपस्थित मागासवर्गीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी जोरदार हसून त्याचे समर्थन केले होते.
वरूणगावकर नांवाच्या एका चित्रकाराच्या घरी जाण्याचा प्रसंग आला होता. खरं पाहता मला वेळ नव्हता. पण कलाकारांचा मी आदर करतो आणि एका चित्रकाराला भेटण्याची संधी हातची सोडायची नाही म्हणून मित्रा बरोबर त्याच्या (चित्रकाराच्या) चाळीतील खोलीवर गेलो होतो. दरवाज्यातच मित्राने माझी ओळख करून दिली. त्यावर, 'अंऽऽ पेठकर? म्हणजे by caste?' असा प्रश्न त्याने विचारला. लक्षात घ्या. दरवाज्यात. मी 'ब्राह्मण' असे सांगितल्यावर त्याने माझ्या कडे एक तुच्छ कटाक्ष टाकून अत्यंत नाईलाजाने (त्याला मित्राकडून काम हवे होते) मला घरात घेतले.
प्रत्येक मागासवर्गीय हा या देशाचा शत्रू, उच्चवर्णीयविरोधी, नि आरक्षण मागणारा आहे असे मानून
असे मी मानतो, असा आपण आरोप केला आहे म्हणून थोडे स्पष्टीकरण. कांबळी नांवाचा माझा एक, इयत्ता ५वी पासूनचा मित्र, आज तागायत मित्र आहे. हा मागसवर्गीय आहे हे माहीत आहे म्हणून त्याचे नांव दिले. बाकी असे अनेक मित्र आहेत की ज्यांची जात कुठली हे माहीतही नाही. मी 'गुणवत्ता' पाहूनच मैत्री करतो. आडनांव आणि जात पाहून नाही. दलित साहित्यावरील दलितांची पुस्तके मी विकत घेऊन वाचतो. गुणवत्ता हाच निकष मी मानतो.
दोष असलाच तर तो संधीसाधू नि जनतेला भुलवणाऱ्या पुढाऱ्यांचा आहे.
ह्यावर आपले एकमत होऊ शकते. पण मागासवर्गीय गट एकत्र येऊन आरक्षण विरोधी चळवळ का चालवत नाहीत? सवलतीचे जातीय निकष बदला असे सरकारला ठणकावून का सांगत नाहीत? आर्थिकदृष्ट्या अत्यंत सबल असणाऱ्या परंतु जातीच्या आधारावर सवलतींचा फायदा उठविणाऱ्या मागासवर्गीय बांधवांविरद्ध आवाज का उठवत नाहीत?
सवर्णांवर टॅक्स बसवून सरकारने मागासवर्गीयांसाठी वेगळी शाळा कॉलेजीस चालवावीत, तिथे सवर्णांना प्रवेश देऊ नये, आणि बाकी शाळा-कॉलेजात मागासवर्गीयांना प्रवेश देऊ नये. सवर्णांच्या शाळा-कॉलेजात सवर्ण शिक्षक-प्रोफेसर आणि मागासवर्गीय शाळा-कॉलेजात मागासवर्गीय शिक्षक-प्रोफेसर अशी व्यवस्था करावी. अभ्यासक्रम एकच असावा. उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुण सारखेच असावेत. युनिव्हर्सिटी एकच असावी. नोकऱ्यांत गुणवत्तेनुसार प्राधान्य असावे. सवर्णापेक्षा मागासवर्गीयास अधिक गुणवत्ता असेल तर बेलाशक मागासवर्गीयास नियुक्त करावे.