ह्या चर्चेचा प्रस्ताव उपहासात्मक आणि भाषा अनावश्यक वाटली. यामुळे विरोधाला विरोध वाढण्याचीच शक्यता आहे.

सामाजिक समतेसाठी आरक्षण आवश्यक आहे, पण ते पूर्णतः आर्थिक निकषांवर असावे असे वाटते. धर्मनिरपेक्ष आणि वर्णव्यवस्था तत्त्वतः न मानणाऱ्या भारतीय लोकशाहीत धर्माच्या आणि जातीच्या अधारावर आरक्षण हा एक मोठा पॅरॅडॉक्स आहे असे वाटते.

उच्चशिक्षणात जातीनिहाय आरक्षण ठेवल्याने अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे कसे कल्याण होणार हे केवळ अर्जुन सिंगानाच माहीत. ज्यांना आर्थिक परिस्थितीमुळे प्राथमिक/माध्यमिक शिक्षण पूर्ण करता येत नाही त्यांना ह्या सवलतीचा काहीच उपयोग नाही. त्यांना प्राथमिक/माध्यमिक शिक्षण मिळावे यासाठी या सरकारने काय प्रयत्न केले आहेत? तसे प्रयत्न जर केले नसतील तर या नव्या प्रस्तावाचा उद्देश केवळ मते मिळवणे हाच आहे हे नाकारता येणार नाही.

हे जर असे करायचे होते तर आधी नियोजन का केले नाही?

नियोजन न करता सर्वस्वी राजकीय फायद्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे दुष्परिणाम बरेच दूरगामी होतील असे वाटते.