इथे कुणाचीही चेष्टा करायचा हेतू नाही पण ऐकलेला एक विनोद. जैन लोकांमध्ये तिर्थंकरांप्रमाणे नावे वा तत्सम नावे ठेवण्याकडे कल असतो की ज्यामध्ये शेवटी अंबर असे येते, तेव्हा एक मनुष्य पहिला मुलगा झाल्यावर गुरुंकडे जातो व विचारतो नाव काय ठेवू ?
गुरुजी सांगतात ठेव दिगंबर !
दुसऱ्यांदा जातो,
गुरुजी सांगतात ठेव निलांबर !
तिसऱ्यांदा जातो,
गुरुजी सांगतात ठेव श्वेतांबर
चौथ्यांदा जातो आणि आता गुरुजी वैतागून म्हणतात
' हे बघ, आता 'सप्टेंबर' पासून सुरुवात कर आणि 'डिसेंबर' झाले कीच ये परत