दुर्दैवाने आपला प्रतिसाद कळला नाही.

 शब्द/वाक्यांचा कीस न पाडताना 'भावार्थ' लक्षात घेतानाच, शुद्धलेखन तपासण्याची टिप्पणी आवडली. (हलकेच घ्या.) 

भावार्थ लक्षात घ्या ह्याचा अर्थ, शब्दार्थाला जास्त महत्त्व देऊ नका असा आहे. अशुद्ध लिहा असा नाही. शब्दार्थ समजण्यासाठीही शब्दाची व्याकरण शुद्धता महत्त्वाची आहे असे मला वाटते. शब्दांवरून वाक्याचा आणि त्यामागील भावांचा अर्थ कळू शकतो. मुळात शब्दच चुकीचे वापरले तर नक्की काय म्हणायचे आहे हे कसे कळणार? उदा. आपल्याच प्रतिसादात 'लोखसंख्येच्या' असा शब्द आहे. नीट अर्थ न कळल्याने, तो शब्द म्हणजे 'लोकसंख्येच्या' असा असावा असा अंदाज बांधावा लागला. हेच शुद्धिचिकित्सक वापरला असता तर वाचकावर असा प्रसंग आला नसता. आपली टंकलेखनाची चूक मान्य करण्यापेक्षा सूचनेची टर उडवून मुख्य मुद्दा डावलण्याची आपली आवड, निकोप चर्चेला बाधा आणत आहे. असो. अशीच चर्चा चालवायची असेल तर त्यात भाग घ्यायची माझी इच्छा नाही.

धन्यवाद.