सर्वसामान्य अर्थाने जराशी वेगळीच वाटणारी नांवे धारण करणाऱ्या अनेक प्रसिद्ध व्यक्ती महाराष्ट्रात होऊन गेल्या व आजही आघाडीवर आहेत.

कुठलेही मूल  मोठे झाल्यावर बाळ रहात नाही. पण कितीतरी महान व्यक्ती बाळ नांवानेच जन्मभर ओळखल्या जातात. (उदाः लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, बाळ गाडगीळ, बाळ सामंत, बाळ कोल्हटकर इ.) कधी कधी पुढे त्यांचे बाळासाहेब  ( शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री बाळासाहेब खेर, माजी मंत्री बाळासाहेब देसाई, माजी सभापति  बाळासाहेब भारदे इ.) किंवा बाळाराव (सावरकर) वगैरे आदरार्थी बहुवचन होते नाहीतर बाळाजी ( बाळाजी विश्वनाथ, बाळाजी बाजीराव इ.) मध्ये रूपांतर होते.

धोंडो केशव कर्वे महर्षीपदापर्यंत पोचले.

भाऊराव पाटील कर्मवीर म्हणून विख्यात आहेत.

अप्पासाहेब पंत यांचे पाळण्यातले नांव काय होते?

हुतात्मा बाबू गेनू ला कसे विसरू शकतो?

पठ्ठे बापूराव हे खरे नांव होते की टोपणनांव?

अशी आणखी कितीतरी उदाहरणे सापडतील. ही मजेदार म्हणता येणार नाहीत.  ही नांवे धारण करणाऱ्या लोकांनी स्वकर्तृत्वाने त्या नांवांना प्रतिठा मिळवून दिली. पण वेगळ्या नांवांचा विषय निघालाच आहे म्हणून ही उदाहरणे दिली.