निधर्मीचा अर्थ शासन एखाद्या धर्माच्या तालावर नाचणारे किंवा धर्म विशिष्टाचा पुरस्कार करणारे नसेल इतकाच आहे असे वाटते. वेगवेगळ्या धर्मांचे अस्तित्व व त्यांना त्यांचे वेगळेपण जपण्याचा अधिकार आहेच. थोडक्यात भारत 'अधर्मी' नाही.
धर्मनिरपेक्षतेत 'मुलभूत अधिकार' इत्यादी धर्म निरपेक्ष असणे अपेक्षित आहे. 'खाजगी कायदे' हि वैयक्तिक बाब समजल्यास काही मर्यादे पर्यंत त्यातही सूट देता येईल. (हा वेगळा विषय आहे, व मनोगतावर तो इतरत्र चालू ही आहेच.)
जातींबद्दल म्हणाल तर, 'सर्व जातींमध्ये समानता' हे ध्येय आहे, लक्ष्य आहे. सध्यपरिस्थिती नाही. ते आणण्याच्या दृष्टीने विधायक पावले उचलली जाणे गरजेचे आहे. पावले कोणती असावित यावर चर्चा करता येणे शक्य आहे. पण 'साऱ्या जाती समान मग पुन्हा जात का विचारता?' असा प्रश्न विचारणे बालिश वाटते. साऱ्या जाती समान होई पर्यंत, त्या कुठवर पोहोचल्या आहेत हे पाहण्यासाठी तरी अशी नोंद घेणे गरजेचे आहे असे वाटते.
थोडक्यात निधर्मी देशात तुम्हाला धर्म विचारला जाणार नाही असा अर्थ असून, तुमच्या धर्माची नोंद घेतली जाऊन त्या प्रमाणे वागण्याचा तुम्हाला (काही मर्यांदांमध्ये) अधिकार दिला जाईल. सरकार तुमच्यावर एखादा धर्म लादणार नाही असा आहे असे वाटते.
सरकार दरबारी घेतलेली जातीची नोंद व जातीवरून हेटाळणी करण्याच्या दृष्टीकोनातून विचारलेली जात यात फारसा अभ्यास न करता लक्षात येण्याजोगा फरक आहे असे प्रामाणिकपणे वाटते.
(खुद्द यूथ फॉर इक्व्यालिटी वाले हे मुद्दे उठवत नाहीत. आपल्याला त्यांचे सारे किंवा फक्त त्यांचेच मुद्दे पटावेत असा आग्रह नाही. ही केवळ माहिती आहे.)