आपल्या कडे हल्ली पूर्वीच्या शास्त्रात सांगितलेल्या गोष्टि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगितल्या होत्या अस म्हणायची फॅशन झाली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उहापोह करतो आहोत आपण. सोयिस्कर अर्थ लावतो आहोत आपण. पुराव्यांशिवाय बोलतो आहोत आपण....आणि श्रेय देतो पूर्वजांना.

सगळ्याच गोष्टींचे पुरावे दिल्याशिवाय त्या खऱ्या आहेत असे न माणणे म्हणजे आपण विज्ञान युगात आहोत असा काहीसा समज आहे.

असो, पण आपल्यातलेच कित्येक असे आहेत ज्यांनी आपल्याच आजोबांना, पणजोबांना, खापर पणजोबांना पाहीले नाही,

आजोबांचे एक वेळ आपण स्वतः बघितलेले असते किंवा, जुने फ़ोटो दाखवून म्हणु शकतो की हा "पुरावा" , पण

पणजोबा, खापर पणजोबा त्यांचे काय? 

शोधा पुरावा...

--सचिन