लेख आवडला. पु. शि. रेग्यांनी त्यांच्या कवितेत वापरलेला 'विप्रश्न' हा शब्द या लेखाला शीर्षक म्हणून समर्पक वाटेल.
-- पुन्हा निरागस व्हावं. शेतातल्या रिठ्याच्या झाडाखाली बसून मनसोक्त रडावं. मन निरभ्र व्हावं, भल्याबुऱ्या सर्व विचारांचा निचरा व्हावा. कोरी पाटी घेऊन पुन्हा मुळाक्षरांपासून आयुष्य नव्याने गिरवायला सुरवात करावी.
आणि
-- अजूनही काही बिघडलेलं नाही. सारं काही मनासारखं होऊ शकतं.
या दोन ध्रुवांत मन कायम गोता खात असतं, हे खरं आहे.
नंदन.
अवांतर --
एकच वाट का चोंखदळत नाहीस यात चोखाळत हवे होते का, की मुद्दाम (विचारभग्न) वेगळे क्रियापद वापरले आहे?