भारत हा एक स्वतंत्र देश असून, लोकशाहीने प्रत्येक नागरिकाला त्याचे मत व्यक्त करण्याचा अधिकार दिलेला आहे.

सहमत.

स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. जोवर वाचास्वातंत्र्याचा उपयोग सामाजिक परिणामांची योग्य ती जाणीव ठेवून आणि जबाबदारीने होत आहे तोवर कोणीही दडपशाही करण्याचे काही कारण आहे असे दिसत नाही.

तसेच आपल्या वाचास्वातंत्र्याचा उपयोग तितक्याच जबाबदारीने आणि लोकशाही मार्गाने विरोध दर्शवण्यासाठी करणे हासुद्धा लोकशाहीतला एक अधिकार आहे असे वाटते.

सरदार सरोवर धरण प्रकल्पाला माझा व्यक्तिशः पाठिंबा आहे. पण विस्थापितांचे पुनर्वसन दिरंगाई आणि कुचराई न होता आणि सन्मानपूर्वक झाले पाहिजे याबद्दल मनात तीळमात्रही संदेह नाही.