आपला प्रतिसाद व व्य. नि. मिळाला. धन्यवाद.

धर्मांचा विचार केल्यास ख्रिश्चन धर्मांधता ही पाश्चात्य जगातून कमी होत आहे व मानवी मूल्ये हे धर्मापेक्षा महत्वाची ही विचारसरणी वाढत आहे. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्य हे धर्मापेक्षा जास्त महत्वाचे ही बाब मान्य आहे. (हे योग्य की अयोग्य हा भाग निराळा)

मुद्दा असा की द विंची कोड लिहिल्यावर लेखकाला जीवाची भिती नाही. याउलट असेच लिखाण आपल्या धर्माबद्दल, महापुरुषांबद्दल किंवा संस्कृतीबद्दल करणाऱ्याला जीवानीशी मारणे किंवा मारहाण करणे हे बेकायदेशीर असले तरी समाजमान्य आहे.

आपल्याकडे असे "धर्मविरोधी" लिखाण /सिनेमा/नाटक लिहिल्यावर त्यावर बंदी /दंगली/मारहाण झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. याचे एक पाश्चात्य उदाहरण द्यावेसे वाटते. "जेरी स्प्रिंगर द ऑपेरा" नावाच्या संगीत नाटकात येशू ख्रिस्ताला अत्यंत असभ्य भाषेत शिव्या दिल्या आहेत, कला म्हणून नाटक उत्तम आहे, हे नाटक आजही लंडनला सुरू आहे व बी बी सी १ वर दाखविण्यात आले आहे. याउलट बर्मिंगहॅम येथे शीख समाजाने शीख धर्माच्या तथाकथित वाईट चालीरीतींवरील नाटक तोडफोड करून बंद पाडले.

सलामानं रश्दींनी लिहिलेले "सटॅनिक व्हर्सेस" प्रमाणमात्र मानणाऱ्या हिंदूंची संख्या काही कमी नाही. व त्यांच्या विरुद्ध काढलेल्या फतव्याबद्दल आपण इस्लाम धर्माच्या सनातनतेबद्दल टीका करण्यास पुढे असतो.

थोडक्यात व्यक्ती स्वातंत्र्य नसल्याने (कमी असल्याने) आपणास असे साहित्य आपल्या भूमीत तयार होताना दिसत नाही.

स्निग्धा