देवमाणूस साहेब, कविता आवडली नाही.
संकल्पनांमधे काहीच नाविन्य आढळले नाही नि कवितेतले इंग्रजी शब्दही खटकले.
पाऊस आला पाऊस आला
झोपडपट्टी धुऊन गेला
घरांची टाळकी स्वच्छ झाली
रस्त्यावरची घाण वाहून गेली
पाऊस आला पाऊस आला
विजेच्या तारा तोडून गेला
गटारातले पाणी रस्त्यावर आले
गटाराच्या नादाने रस्ते बिघडले
अशी कडवी लिहून चांगली कविता कशी होणार? हे म्हणजे गद्याचे फक्त यमके जुळवून कविताकरण केल्यासारखे झाले.
असो, प्रामाणिक मत, राग नसावा. आम्हाला आपल्याकडून याहून चांगल्या कवितांची अपेक्षा आहे.
एक वात्रट