नीलकांत,

जर लेखक महाशय पहिला परिच्छेद लिहून थांबले असते तर स्तुत्य होते, दहशतवादाचा निषेध रास्तच आहे. त्याला सर्वांनी दुजोरा दिला असता. मात्र दुसरा परिच्छेद कशासाठी?

बाहेरचे हल्ला करतील तेव्हा आम्ही वैर विसरून एक होउ ही मल्लीनाथी कशाला? ते तर क्रमप्राप्तच आहे, जर परकीयांची साथ द्याल तर गोळ्या खाऊन मराल वा वाचलात तुरुंगात सडाल हे स्पष्ट आहे.

या परिच्छेदामागील हेतू सरळ नसून

१) माझे संघाशी वैर आहे हे दाखवणे - अगदी अप्रस्तुत प्रसंगीसुद्धा लेखक महाशय हे विसरत नाहीत आणि जर लोक विसरले असले तर त्यांना सांगू पाहतात.

२) तरीही मी त्याना सहानुभूती दाखवतो - म्हणजे आपण किती महान आहे हे भापवणे हाच हेतू त्यामागे आहे.