"वयं पंचाधिकं शतम्" हे सूत्र मांडणारा प्रत्येकजण स्वतःला पांडवच (रास्त/योग्य) समजतो. समोरील बाजू कौरवांची (चुकीची/अयोग्य) आहे असे मानतो. त्यामुळे शिवश्री एकाच वेळी कौरव/पांडव असणे किंवा नसणे हा कोणत्या नजरेतून पाहतो यांवर अवलंबून आहे.

वैचारिक मतभेद बाजूस ठेवून परकीय संकटांचा निषेध करण्यासाठी आम्ही सारे एकच आहोत.

परंतु या हल्ल्यांचा उपयोग दोन धर्मांमध्ये फूट पाडण्यासाठी करण्यात येऊ नये, ही माफ़क अपेक्षा!

शिवश्री - केवळ याच वेळी नाही तर इतरही वेळी वाद उभे करताना समाजाचे हित हे मोलाचे असून फाटाफूट टळेल अश्या भाषेचा वापर -- तू काय किंवा मी काय -- आपण सारेच जण करू या.