थोडक्यात व्यक्ती स्वातंत्र्य नसल्याने (कमी असल्याने) आपणास असे साहित्य आपल्या भूमीत तयार होताना दिसत नाही.

असे मला वाटत नाही.

प्रथम उत्तरार्ध -

रिडल्स इन हिन्दुइझम हे आंबेडकरांचे अगदी अलिकडच्या काळातील उदाहरण डोळ्यासमोर आले. प्रतिक्रिया उमटणार हे अगदी स्वाभाविकच आहे. पाश्चात्य जगातही ती उमटलीच... काही ठिकाणी अगदी उग्रपणेदेखील. पण असे साहित्य हे नक्कीच होत असते. समाजाची वेगवेगळे विचार स्वीकारण्याच्या मानसिकता फार पूर्वीपासूनच आहे. "कोडा"चा संदर्भ कमी होता हे मान्य केले तरीदेखील तुकारामांचे लिखाण हे ही प्रस्थापित व्यवस्थेविरुद्धच होते. शेषाच्या मस्तकावर डोलणारी पृथ्वी हा उत्क्रांतीवादाच्या मूळावर उठल्याचा दाखला नाही. चातुवर्णाच्या शीर/पाय यापासूनच्या उत्पत्तीसारखी विधाने केव्हाच बहिष्कृत झालेली आहेत. किंबहुना धर्मसूत्राचा ती भाग नाहीतच अशी परिस्थिती झालेली आहे.
अगदी प्राचीन काळात जायचेच झाले तर (जे टाळतो आहे!!) तर जैन, बौद्ध, शीख अश्या धर्मांची निर्मिती आणि सहज सुंदर असे सहजीवन हे धर्मविचाराबाबत अगदी समूळ आव्हानात्मक लिखाणाशिवाय झालेले नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
मनोगतावरील महाभारत/रामायण यांवरील चर्चा हे एक प्रतिबिंब म्हणून मानायला हरकत नाही.

पूर्वार्ध - उत्तरार्ध हा पूर्वार्धाशिवाय शक्य नाही.
आंबेडकरप्रणीत धर्मांतर हे अस्वस्थ करणारे होते, मात्र देश तोडणारे, डोकी फोडणारे असे झाले नाही.
तसेच केवळ प्रतीकात्मक म्हणून धर्माकडे/लिंगाकडे बोट दाखवायचे झाल्यास अल्पसंख्यांक राष्ट्रपती, अल्पसंख्यांक पंतप्रधान, महत्वाच्या आणि निर्णयक्षम पदांवर महिला, इतकेच नाही तर परदेशी मूळ असणाऱ्या व्यक्तीलाही खऱ्या अर्थाने सामावून घेतल्याचे दाखले पाहता व्यक्तिस्वातंत्र्याबाबत भारताकडे बोट दाखवावे अशी परिस्थिती नाही.
आणखीही प्रगती या दिशेने हवी हे मान्य! पण तो स्वतंत्र विषय!!

आधीच्या प्रतिसादात एका ठिकाणी वाक्यांचा क्रम विस्कळित झाल्याने संपादित केले आहे.