अमित, फ़ारच कामाची माहिती दिली बुवा तुम्ही. पण आजच्या धकाधकीच्या जीवनात खरोखर कठीण जाते हो. त्यातही एकटे असले तर विचारुच नका. कधी तर नाही काही खाल्ले तरी चालवुन घेतो आम्ही:( मग मात्र वेदश्रीने सांगितल्याप्रमाणे आईची आठवण येते.

सात्विक प्रवासी महाराज, ज्या पोळीसाठी मी इथे तरसतो, त्या पोळीलाच तुम्ही वगळले मराठी मानसाच्या रोजच्या आहारातुन:( अहो, पोळी शिवाय जेवण कसे अधुरे असते. मी तर दुपारच्या जेवणात पोळी आवर्जुन घेतो. मग ती मैदा मिश्रीत का असेना:) रात्री घरी काही करायचे म्हटले की फ़ार जीवावर येतं. मुड असलं की मसाले भात, नाहीतर दुध आणि ब्रेड, नाहीतर..... हमम...काहीच नाही:(

जेवणाच्या बाबतीत नखरे मात्र कधी केले नाही. घरी सगळे चिडवून म्हणायचे, तुझ्या बायकोला अजिबात त्रास होणार नाही. पण तीच सवय आता कामी येतेय. आमचे नेहमीचे ब्रीदवाक्य, "अन्न हे पुर्णब्रम्ह..."