"करीसी भलता शोक वरी ज्ञानही सांगीसी..." हे कृष्णाचे किंकर्तव्यमूढ अर्जुनाला गीता सांगायला सुरवात करताना काढलेले उद्गार वर्षानुवर्षे चालत आलेल्या "परदेशात (म्हणजे फ़क्त अमेरिकेतच बरका!) स्थायीक व्हावे का नाही" या चर्चेत हिरीहिरीने भाग घेणाय्रांबद्द्ल (त्यात आता मीही आलो!) चपखल बसतात असे वाटते.  काही माझे आणि काही संक्षिप्तरूपातील इतरांचे) मुद्देः

  1. कुणी कुठे रहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे...
  2. नक्की माहीत नाही पण भारतीय आणि त्यातही मराठी माणसे याविषयाला नैतीकतेच्या चष्म्यातून बघत राहातात. 
  3. ह्याचर्चेत भागीदार असलेल्यांनी  नक्की काय (कुठेही) दिवे लावले आहेत ज्याचा संबंध हा पैशाव्यितीरीक्त सक्रीय मदतीशी जोडता येईल?

मला वाटते की नकळत आपण ही चर्चा ही स्वतः घेतलेल्या जेथेकोठे स्थायीक होण्याच्या भुमीकेला इष्ट म्हणून सिध्द करण्याचा खटाटोप वाटतो.  माझे काही अनूभवः

  1. अमेरिकेत आल्यावर प्रथमच जेव्हा भारतात गेलो तेंव्हा एका सार्वजानीक ठिकाणी एका माणसाशी ओळख करून देण्यात आली. मी कुठे असतो एव्हढे सोडून सर्व बोललो. पण जेंव्हा विचारले तेंव्हा अमेरिकेत म्हणून सांगीतले.  लगेच त्याव्यक्तीने वाकडा चेहरा करत उद्गार काढले,"अरेरे या माणसाला काहीच अर्थ नाही..." (ही व्यक्ती मला कुठ्ल्या शहरात भेटली असेल ते ओळखा पाहू!)
  2. अमेरिकेत स्थायीक झालेल्या काही भारतीयांबरोबर जेंव्हा परत भारतात जाण्याचा हेतू बद्द्ल बोललो तेंव्हा त्यांच्या चेहय्रावरील हावभाव व शाब्दीक प्रतिक्रीयेतून जरा राग आलेला (offensive) जाणवला.  दुरावा वाढीस लागला...

पहिल्या अनुभवात न्यूनगंड दिसला तर दुसय्रामधे अहंगंड...विशेष म्हणजे यातील दोन्ही व्यक्ती भारतासाठी काहीच करताना दिसल्या नाहीत अथवा पाट्या टाकण्याच्या कामाव्यतिरीक्त काही समाजोपयोगी करताना दिसल्या नाहीत.

थोडक्यात मला काय जाणवले की आपण कुठे स्थायीक होतोय ह्यापेक्षा कुठ्ल्याही प्रकारचा गंड मनामधे न ठेवता राहून स्वतःसाठी आणि समाजासाठी काम करणे महत्वाचे आहे...त्या विषयावर ("समाजोपयोगी") चर्चा करायला आणि काहीतरी स्वतः करायला तयारी आहेका?

आता शेवटी, परदेशातील भारतीयांनी परत भारतात यावेका?

या विषयावर सुमारे बारा वर्षांपुर्वी अमेरीकेत एका परखड भारतीय सांस्कृतीक नेत्याला एका भारतीयानी मोठा आव आणून विचारले की आम्हाला (NRIs)भारतासाठी इतक्या लांबून काय करता येईल?

त्यावर हा नेता म्हणाला की भारतासाठी जे काही करायचे आहे ते भारतातील लोक करत आहेत - सर्व विचारांचे आणि सर्व पक्षांचे... राहता राहीला तुमचा प्रश्न, जेंव्हा भारतमातेला चांगले दिवस येतील तेंव्हा तुमचे पाय आपोआप इकडे वळतील!