त्यांच्याकडून अपेक्षा ठेवाव्यात का? हाच मूळ प्रश्न आहे. ते अमेरिकि नागरिक आहेत. तुम्ही अमेरिकेवर प्रेम करता का? मग अमेरिकेत जन्मलेल्या व्यक्तीने तुमच्या देशावर प्रेम करावे असा अट्टहास का?
- मी अमेरिकेत जन्मलेल्या भारतीयांब्द्दल बोलत आहे (दुसरी पिढी). आणि, तीच पिढी, पुढच्या भारती पिढीला स्पधा आहे!!
आणि, प्रतेक भारतीयाने भारतावर प्रेम करावे हा योग्य अट्टहास आहे (माझ्या मते)!!
यादीप्रमाणे इस्त्राईलचा नंबर इराण, इजिप्त च्या खाली आहे, तर इराक, सिरीया, लेबनान यांच्या वर आहे असे दिसते. तसेच जगात कितवा नंबर आहे हा माझा मुद्दा नव्हता. मुद्दा हा की ज्यूंनी चतुरतेने अमेरिकेत अश्या जागा संपादन केल्या आहेत की ते एका महासत्तेला त्यांच्या बाजूने वळवून घेण्यात यशस्वी झाले आहेत. आणि ही त्यांची पहिली पिढी नव्हे.
- का? तुम्ही अमेरिकेचे भारत प्रेम सध्या पाहात नाही का?
तत्पर्यः दुसर्या देशाचे प्रेम मिळवण्यास तुम्ही तेथेच जाणे जरुरी नाही!
सगळेच घटक महत्त्वाचे आहेत. कोणी परदेशात जाईल, कोणी सैनिक बनेल, कोणी पोलीस बनेल, कोणी शिक्षक.परदेशात जाणारे देशात राहून याच व्यवसायांत पडलेच असते कशावरून.
- पोलीस, शिक्षक, सैनिक हि उदाहरणे आहेत.. शब्दशहा अर्थ घण्यात काय शहाणपणा आहे?? याच नाही, तर दूसर्या व्यवसायात पडुन चांगले काम करता येणार नाही का??
दरवर्षी देशातले फक्त ०.०१% टक्के लोक या देशातून परदेशात गेले तर वरील व्यवसाय करायला कोणी मिळणारच नाही हा युक्तिवाद दिशाभूल करणारा आहे.
- मी कधी म्हणालो की वरील व्यवसाय करायला कोणी मिळणारच नाही?? हि तुमच्या मनातील कल्पना आहे.
माझ्या शिक्षणावर भारत सरकारने फार काही खर्च केला असावा असे दिसत नाही. केला असेलच तर मी ते ऋण माझ्या नोकरीच्या काळात प्राप्तिकराच्या रूपाने सव्याज आणि घसघशीत स्वरूपात फेडले आहे असे वाटते.
- विषयांतर
एखादा अभियंता भारतात राहिला तर ती देशसेवा आणि देशाबाहेर राहिला तर देशसेवा नाही हे कसे? तसेच चोराचा धर्म चोरी असतो. तो चोरही देशात राहत असेल तर चोरी देशसेवा कशी ठरते?
- अभियंता भारतात राहिला तर त्याचा फ़ायदा कोणत्या देशाला होतो? (किती सोपे उत्तर आहे!)
मला वाटते, चोरी हा अधर्म आहे.. आणि आपण त्या बद्द्ल बोलत नाही..
पण दर वर्षी दोन कोटी नवीन लोक सैन्यात भरती होण्यास लायक बनतात. तरीही भारतीय सैन्यात माणसांची कमतरता का भासते? भारतातले सर्वजण शिपाई नाहीत असे वाटते.
- विषयांतर
उद्धट असले तरी त्यांचा संपर्क परदेशातल्या सामान्य माणसांशी येतो आणि ते एखादा राजदूत खचितच करू शकतो. (तसेच परदेशातल्या भारतीय मंदिरांत भारतीय कसे वागतात याचा भारतीयांनी परदेशात-राहावे की नाही या चर्चेशी असलेला संबंध समजला नाही.)
- तुमचे वाक्यः "परदेशस्थ नागरिकांमुळे मूळ देशाची प्रतिमा स्पष्ट व्हायला मदत होते असे वाटते." - उद्धट भारतीय देशाची प्रतिमा स्पष्ट करणार?? माझ्या वाक्याचा संबंध तुमच्या खालील व्क्याशी होता "परदेशस्थ नागरिक हा त्या मूळ देशाचा परदेशातला एक प्रतिनिधी आणि दूत असतो असे वाटते. "
भारतात राहून हे संपूर्णतः अशक्य आहे असे वाटत नाही का? भारतातच राहिले तर परदेशातल्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाचे रक्त असण्याची शक्यता शून्य आहे असे वाटते.
- परदेशातल्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाचे रक्त असण्याचा अट्टहास का? त्याचा उपयोग होण्याची खात्री काय?
भारतात राहणाऱ्या भारतीयांकडून देशसेवा कशी घडते आहे ते सांगावे.
- हा एक वेगळा विषय होईल. - विषयांतर
असा विचार किती भारतीय अपत्ये करतात?
- हा एक वेगळा विषय होईल. - विषयांतर
१००कोटी जनतेपैकी किती लोक आपल्या कामाशी प्रामाणिकपण आहेत असे वाटते?
- हा एक वेगळा विषय होईल. - विषयांतर
आता या क्षणी भारतातली एकूण सर्व व्यक्ती देशप्रेमी आहे असे आपण छातीठोकपणे सांगू शकता काय? म्हणजे देशात राहणारे ९९% कसेही असले तरी चालतील. देशाबाहेर जाणारे १% मात्र १००% मूळ-देशप्रेमी हवेत असा आपला हट्ट आहे का?
- हा विषय भारतात रहाणाऱ्यां बद्दल आहे का? आणि, प्रर्त्येक भारतीयाला भारताबद्दल प्रेम टावे हि ईछा करणे हा गुन्हा असेल, तर हो, मी गुन्हा केला!
संतांनी इतर अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आचरणात आणण्यासाठी भारतात राहणे आवश्यक आहे असे कोणीही कुठेही लिहिलेले नाही.
- परदेशात जा असे कोठे लिहिलेले आहे??