>>भारतीय चालीरीती, सण, अन्न, भाषा ईतक्या आकर्षक आहेत, की खुप लोंकाना खुप वर्षा पासुन त्याचे कौतुक वाटते... त्याने देशाचा असा आतापावे किती फ़यदा झाला? आपण आपले मनुष्यबळ दुसऱ्या देशाकरता देउन आपल्याला त्याचा म्हणावा ईतका फ़ायदा होत नाही असेच वाटते..
<<
आपण असे विचारले होते की राजकारणात शिरलेले भारतीय भारताबद्दल सहानुभूती बाळगतीलच हे कशावरुन. तर भारतीय संस्कृतीबद्दल प्रेम असेल तर तसे होण्याची शक्यता जास्त आहे हे सांगण्याकरता ह्याचा उल्लेख केला.
अमेरिकेचे जगातील स्थान, महत्त्व नजीकच्या काळात ढासळेल असे खास वाटत नाही. आपणास तसे का वाटते बरे? उलट मला असे वाटते की भारतातील अडाणी, मूर्ख लोकांची संख्या जास्त गतीने वाढत आहे. ह्या गटाला खूष करायला सवंग मार्गाने नेते मत मिळवतात आणि हे प्रकार वाढतच जाणार. आरक्षण, फुकट वीज, फुकट घरे वगैरे ही त्यातली आश्वासने. अशाने सुशिक्षितांचे भारतातील जीवन कठीण होत जाणार आहे. ह्या भारतीय राजकारण्यासमोर आर्थिक गुंतवणूकीचे गाजर उभे केले तर त्याच्या हावेने तरी ते हिताच्या गोष्टी करु धजतील. ह्याकरता परदेशी भारतीय मोठा हातभार लावू शकतील.
अमेरिकेतील भारतीय सैन्यात गेले तरी अमेरिका भारताविरुद्ध युद्ध घोषित करण्याची किती शक्यता आहे? माझ्यामते नगण्य. मुस्लिम धर्मांधतेचा धोका वाढत असल्याने अमेरिका आणि भारत समदुखी बनले आहेत. मला तरी ही परिस्थिती इतक्यात बदलेल असे वाटत नाही.
आपले १० रुपये १०० रुपये वगैरे तुलना मला पटत नाही. मला वाटते योग्य तो फायदा होण्याचे पोटेन्शियल आहे.
चीनमधे हुकुमशाही असल्यामुळे सुधारणा करणे सोपे आहे. भारतात लोकशाही आहे आणि तिथे अप्रिय पण हिताचे निर्णय घेणे अत्यंत कठिण. फार काय, स्वच्छ चारित्र्याच्या लोकांना निवडुन येणेही दुर्घट आहे.