चित्रपट गीतांना संगीत देण्यासाठी शास्त्रीय संगीत खूपच उपयुक्त ठरते यात वादच नाही.पण काही संगीतकार असेही आहेत की ज्यांना शास्त्रीय संगीताचा ओ की ठो माहित नाही. (किंवा तसा ते दावा करतात)
अनेकदा असे वाचनात आले आहे की सुप्रसिद्ध संगीतकार ओ पी नय्यर यांना रागदारी ची माहीती नाही. तरीही त्यांनी रागांवर आधारित अनेक गाणी दिली आहेत. उदा.
तसेच फागुन या चित्रपटातील सर्वच्या सर्व गाणी त्यांनी पिलु मध्ये बांधली आहेत. मराठीतील सुप्रसिद्ध संगीतकार राम कदम यांच्या बाबतीतही अशीच वदंता आहे. पण त्यांनीही देरे कान्हा हे शास्त्रीय रागावरच बांधले आहे.
अत्यंत अवघड चालींसाठी नावाजले गेलेले स्व. मदन मोहन यांच्या बाबतीत असेच ऐकले आहे. पण त्यांचे प्रत्येक गाणे कोणत्या न कोणत्या रागावर आधारित आहेच. त्यामुळे मदन मोहन यांच्या बाबतीत हे मत योग्य वाटत नाही. आपल्यापैकी कुणाला माहिती असल्यास कळवावे.
सर्व आघाडीचे संगीतकार हे शास्त्रीय संगीत स्वतः शिकले आहेत किंवा त्यांना त्याची पूर्ण माहिती आहे.