फॉक्स नावाच्या वाहीनीवर ओ-रायली नावाचा माणूस लोकांना वाद-चर्चे साठी बोलवतो आणि त्यांचे मुद्दे ऐकून न घेता आपलाच मुद्दा बरोबर कसा आहे हे दामटून सांगतो. पर्यायाने चर्चा न होता चर्चेत विजय मिळवल्याचा वृथा अभिमान सदर माणसाला मिळतो.

या चर्चेतही मीच काय तो बरोबर असा अनुभव येत आहे. दुसऱ्या बाजूचे म्हणणे ऐकून त्यावर विचार करणे वगैरे दूरच राहीले.

१. स्वदेशस्थ भारतीय परदेशस्थ भारतीयांबद्दल किती आपुलकी दाखवतात?
२. NRIना नॉट रिक्वायर्ड इंडीयन्स म्हणले जाते. अश्या प्रकारे हिणवल्या जाणाऱ्या लोकांकडून स्वदेशस्थ भारतीयांनी अपेक्षा ठेवणे योग्य कसे?
३. परदेशस्थ स्वतःहून परदेशी जातात. तेंव्हा तुम्ही कुठे राहावे हे सांगायला येतात का? मग देशस्थ भारतीयांनी परदेशस्थ लोकांना कुठे राहा, काय करा हे सांगण्याचा काय अधिकार आहे?
४. स्वदेशस्थ भारतीय भारतात राहून अशी काय महान देशसेवा करतात की ज्यांनी परदेशस्थ भारतीयांना अमके करा- तमके करा असा उपदेश करावा? सामान्य माणसांच्या महान देशसेवेची उदाहरणे द्यावीत. बाबा आमटे किंवा तत्सम व्यक्तिंची नावे अपेक्षित नाहीत. ती माणसे वादातीत असामान्य आहेत असे वाटते.
५. तसेही देशसेवा किती आणि कशी हा म्हणावे तर ऐच्छिक मुद्दा आहे असे वाटते.

तस्मात मी माझ्याकडून ही चर्चा बंद करत आहे. ज्यांना "आम्ही भारतात राहतो किंवा भारतात परत जाणार आहोत म्हणून आम्ही ज्येष्ठ देशसेवक आहोत" अश्या शब्दात 'अहं' जोपासायचे असतील त्यांनी जोपासावे. त्यांना शुभेच्छा!

जय हिंद!
वंदे मातरम्!