कोंबडीदेवी नमस्कार,
भारताची आज इराक किंवा दार्फ़ूर सारखी प्ररीस्थिती असती, तर आज "मातृभू", "भारतभू" म्हणून "भूभू"त्कार करणाऱ्या बहुतांश परदेशस्थांनी भारताकडे ढुंकूनही पाहिले नसते, आणि बहुतांश देशस्थांनी ढुंxxx पर्यंत पंख ताणून परदेशी पलायन केले असते, हे वेगळे सांगायला नकोच (यात विनोद किंवा उपहास नाही).
तुम्ही म्हणता तशी परिस्थिती भारतावर कधीच येऊ नये म्हणून आम्ही कार्यरत आहोत. तुम्हीही तसे असावे असे आम्हाला वाटते.
तुम्ही परदेशस्थांबाबत जे म्हणता त्यास सारेच परदेशस्थ भारतीय सहमत असतील असे नाही.
इथल्यांबाबत तुमच्या कल्पना अपुऱ्या दिसतात. आम्हाला तरी पंख लावून पळण्यासारखा देश पृथ्वीतलावर दुसरा नाही. जीना यहाँ, मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ? हीच आमची सहजस्थिती आहे. असो.