१. स्वदेशस्थ भारतीय परदेशस्थ भारतीयांबद्दल किती आपुलकी दाखवतात?
२. NRIना नॉट रिक्वायर्ड इंडीयन्स म्हणले जाते. अश्या प्रकारे हिणवल्या जाणाऱ्या लोकांकडून स्वदेशस्थ भारतीयांनी अपेक्षा ठेवणे योग्य कसे?
३. परदेशस्थ स्वतःहून परदेशी जातात. तेंव्हा तुम्ही कुठे राहावे हे सांगायला येतात का? मग देशस्थ भारतीयांनी परदेशस्थ लोकांना कुठे राहा, काय करा हे सांगण्याचा काय अधिकार आहे?
४. स्वदेशस्थ भारतीय भारतात राहून अशी काय महान देशसेवा करतात की ज्यांनी परदेशस्थ भारतीयांना अमके करा- तमके करा असा उपदेश करावा? सामान्य माणसांच्या महान देशसेवेची उदाहरणे द्यावीत. बाबा आमटे किंवा तत्सम व्यक्तिंची नावे अपेक्षित नाहीत. ती माणसे वादातीत असामान्य आहेत असे वाटते.
५. तसेही देशसेवा किती आणि कशी हा म्हणावे तर ऐच्छिक मुद्दा आहे असे वाटते.

भोमेकाका,

तुमच्या मतांशी १००% सहमत. मस्त लिहिले आहे.

रोहिणी