मला वाटतं एखाद्याने/एखादीने परदेशात कायमचं वास्तव्य करणं किंवा न करणं हा त्याचा/तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. ज्यांना इथे राहायचं नाही, त्यांनी खुशाल परदेशात जावे, आम्ही काहीच म्हणणार नाही. त्याने आम्हाला काय फरक पडतो? मात्र परदेशात जाणारे नि तिथे स्थायिक होणारे(हे महत्वाचं - नाहीतर तसे महात्मा गांधी, भारतरत्न आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर - असे अगणित लोक परदेशी जाऊन भारतात परतले.) सगळे लोक परदेशातल्या समृद्धीला, तिथल्या पैशाला, तिथल्या राहणीमानाला भुलून भारताला सोडून परदेशी जातात हे एक वास्तव आहे नि ते मान्य करायला त्यांना काहीच अडचण नसावी.
१००% सहमत. अगदी खुल्या दिलाने मान्य. अशीच कबुली कुठेही राहणाऱ्या, पण आव आणणाऱ्या बहुतांशी लोकांनी (किमान स्वतःची स्वतःला तरी) द्यावी, म्हणून हा प्रपंच.
आता ,भारतात राहिले की आपोआप देशभक्त आणि भारताबाहेर राहिले की आपोआप देशद्रोही हा समज पूर्णपणे चुकीचा होय. असे काही नसते. भारतात राहून देशद्रोह करणारे इथे कमी आहेत काय? तसेच भारतातल्या गरीब लोकांना, समाजाला मदत करणारे परदेशस्थ आहेतच की. भारताबाहेर राहून जर कोणी विधायक कार्य करीत असेल (मग ते भारतासाठीच पाहिजे असा हट्ट नाही) तर माझ्यामते तो मनुष्य भारतात राहायचे म्हणून भारतात राहणाऱ्यांपेक्षा अधिक बरा.
१००% सहमत हे आधी आलेच आहे.
आता अजून एक मुद्दा - भारतातले लोक अमेरिकेत किंवा इतर कोणताही देशात जाण्यासाठी अगदी हपापलेले किंवा तडफडत असतात असे म्हणजे अक्षरशः मूर्खपणा होय.
१००% सहमत. म्हणूनच मी असे कुठेही म्हटलेले नाही. असल्यास दाखवा (टोकाच्या उदाहरणांत होणारा "नाईलाज" वगळता)
आता एक उदा. म्हणून सांगतो, आज जर तुमच्याजवळ बक्कळ पैसा असेल तर आज कोणत्याही भारतीय मुलाला अमेरिकेत शिक्षण घेणे नि नंतर तिथे स्थायिक होणे हे मुळीच अशक्य नाही, पण अशी सगळीच मुले काही अमेरिकेत पळत नाहीत. अनेक जण भारतात अगदी सुखाने रहात आहेत. आहेत ना?
बरोब्बर.
कुठलाही देश म्हणजे स्वर्ग नाही, प्रत्येक देशाच्या आपल्या समस्या असतातच. कोणताही देश याला अपवाद नाही. आपण काय कमावणार नि काय गमावणार याचा विचार करून लोक या गोष्टीचा निर्णय घेतात असे वाटते.
याचा आणि याचाच विचार करून! हेच हेच हेच हेच माझे म्हणणे आहे (बहुतांश लोकांबद्दल). एवढे मान्य झाले तरी चर्चा थांबबीन.
अर्थात इथे काही लोकांनी देशभक्तीची शाकाहाराशी केलेली तुलना वाचून आणि घडोघडी केलेले विषयांतर पाहून मनोरंजन झाले. म्हणजे मांसाहार करण्याची हिंमत नाही म्हणून शाकाहारी तसे अमेरिका या स्वर्गात काही केल्या जाता येत नसल्याने आम्ही नाईलाजाने भारतात राहतो,
शाकाहाराच्या उदाहरणात हिंमत नाही, असे मी म्हटलेले नाही. "जमत नाही" (माझे स्वतःचे उदाहरण), "गरज नाही", "वाटले नाही", "अडत नाही", "चालत आले आहे ते चालू द्या" ही मात्र बहुतांश लोकांची शाकाहाराला धरून राहण्याची कारणे आहेत, यात दुमत नसावे. यातील काही लोक मात्र त्यातूनच भूतदयेचे श्रेय उपटतात. आक्षेप त्याला आहे. तुम्ही (व्यक्तिशः) तसे करणार नाही, असे तुमच्या प्रतिसादांवरून वाटते.
भारत जर आज इराकसारखा असता तर आम्ही ढुंxxx पर्यंत पंख ताणून अमेरिकेला पळत सुटलो असतो असे आपण कशावरून म्हणता? त्यासाठी भारताने इराकसारखे कशाला असायला हवे?
इथे अमेरिकेचा काय संबंध? देशातील परीस्थिती अत्यंत बिकट झाली, तर नाईलाजास्तव का होईना, बहुतांश लोक देश सोडण्याचा निर्णय घेतील, आणि देशाबाहेर असणारे लोक हे इतर देशांच्या नागरीकत्त्वावर लाथ वगैरे मारून परत जाण्याचा विचार मनातही आणणार नाहीत - आणि तशी वेळ आज आपल्यावर नाही म्हणून आपण अशा चर्चा करू शकतो, हा तो मुद्दा आहे (तो चर्चेच्या मूळ मुद्द्यापासून विषयांतर करणारा आहे, हेही मान्य). इराकसारखे/दार्फूरसारखे उदाहरण असल्याशिवाय ही वस्तुस्थिती ढळढळीत पणे उघड होणार नाही - म्हणूनच इराकचे उदाहरण.
असो. निदान, भारत जर आज इराकसारखा असता तर आपण भारताकडे ढुंकूनही पाहिले नसते हे मान्य केल्याबद्दल तरी आपल्याला धन्यवाद द्यायलाच हवेत.
आता मात्र आपण चर्चा वैयक्तिक पातळीवर नेत आहात. मी प्रत्येक ठिकाणी बहुतांश हा शब्द अधोरेखित केला आहे. तेथे तुमचे-माझे वैयक्तिक उदाहरण अपेक्षित नाही. मात्र इराक/काश्मीर (पंडितांसाठी) सारखी परीस्थिती असेल तर बहुतांश लोक संधी असतानाही (हा महत्त्वाचा शब्दप्रयोग आधी राहून गेला) देशांतर करणार नाहीत, असे तुम्हाला वाटत असेल, आणि त्याचे कारण तुम्ही "जननी जन्मभूमिश्च" वगैरे द्याल, असे तुमच्या इतर प्रतिसादांवरून मलाही वाटत नाही.
- कोंबडी