दैनिक सकाळ तारीख ०५ जुन २००६ (संपादकीय पान)
अग्रलेखः
वेध भवितव्याचाः
- हे लेखन शिक्षणा संदर्भात आहे. आपल्या चर्चेशी संदर्भीत वाक्ये देत आहेः-

"परदेशांतील विद्यापीठांमध्ये चमकणाऱ्या भारतीयांची संख्या जितकी वाढेल तितकी चांगलेच; कारण असे गुणवान विद्यार्थी जगाच्या बाजारपेठेत देशाची प्रतिमा घडवीत असतात; पण या विद्यार्थ्यांची बुद्धी देशाच्या कामी लागण्याऐवजी परदेशी उद्योगपतींचा नफा वाढविण्यासाठीच कारणी लागणार असेल, तर तो मोठा धोका आहे. या विद्वत्तेचा वापर स्वदेशाच्या कामी कसा करून घेता येईल याचा सरकारने गांभीर्याने विचार करण्याचीही हीच वेळ आली आहे. "ब्रेन ड्रेन' असे म्हणत बोटे मोडण्याचे दिवसही आता उरलेले नाहीत. जागतिकीकरणाच्या वातावरणात तुमच्या देशातील बुद्धी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेली, तरीही तिचा वापर आपल्यासाठीही होऊ शकतो याचा विचार सतत बाळगायला हवा. शिक्षणासाठी बाहेर वळणाऱ्या पावलांना सरसकट स्वार्थाचे लेबल डकविण्याऐवजी त्यांच्यातील गुणवत्तेला चालना देण्याचेच धोरण प्रगटायला हवे."

सकाळचे पान