षड् अनर्थाः महाराज, कच्चित् ते पृष्ठतः कृताः?
निद्रा, आलस्यं, भयं, क्रोधो, मार्दवं, दीर्घसूत्रता॥      (महाभारत- सभापर्व-अध्याय-५ , श्लोक- १२९)
अर्थ-- धृतराष्ट्राकडून इंद्रप्रस्थाचे राज्य मिळाल्यावर तेथे धर्मराज युधिष्ठिर यथायोग्य प्रजापालन करीत ऐश्वर्याने राहत असता नारद ऋषी त्याला भेटायला आले असता त्यांनी प्रश्नरुपाने धर्मराजाला राजधर्माच्या कर्तव्याचा उपदेश केला,
   " हे महाराज, तू ह्या सहा दोषांकडे पाठ फिरविली आहेस, होय न?--- निद्रा(गाफिल राहणे), आळस, भित्रेपणा, रागीटपणा, अतिसौम्यपणा व चेंगटपणा, हे ते सहा अनर्थ."