राहुल महाजनाच्या निमित्त्याने आपल्या लोकांची आणि लोकशाहीची लक्तरे टांगली गेली असेच वाटते. कॉग्रेसला अश्या घटनांचे भांडवल करुन ज्यांना काही पायपोस नाही अश्या लोकांना राजकारणामध्ये आणायची सवय असे. तसाच प्रयत्न भाजपा सारख्या तत्वनिष्ठ पक्षाने करावा ही आपली शोकांतीकाच वाटते. आज जर राहुल राज्यसभेमध्ये निवडुन गेला असता तर भाजपाने, शरद पवार यांनी काय स्पष्टीकरण दिले असते हे समजत नाही.

 या तुलनेत मन स्वातंत्र्यकाळीन नेत्या मध्ये रमत जाते. गांधीनी आपल्या मुलाशी सार्वजनिकरित्या संबंध तोडले होते, लालबहाद्दुर यांनी मुलाला त्याच्या पात्रतेप्रमाणे नौकरी द्यावी असे सांगीतले होते. अशी तत्वनिष्टा कोठे गेली हे समजत नाही.

या पार्श्वभुमीवर अटलजींचे तारुण्यात अश्या चुका घडायच्या हे विधान मनाला विषण्ण करत जाते.