माझ्या मते जरुर करावी. ही एक संधी असते हुशार मुलांना व त्यांच्या विचारांना जाणण्याची. काय जाते जरा वर्षातून एकदा दुसऱ्यांचे कौतुक करायला. आणि आपली कुवत लक्षात घेऊनच अपेक्षा ठेवाव्यात म्हणजे उगाच नैराश्य येणार नाही. उद्या कुणी म्हणेल सुंदर लोकांना पाहून आम्हाला न्यूनगंड येतो सबब सर्व सुंदर लोकांना आमच्या गावातून घालवून द्या. एखाद्याच्या निसर्गदत्त देणगीचे ही कौतुक करता आले पाहीजे. नाही तर इकडे गुणवत्ता यादी नको म्हणायचे आणि परदेशातील यशस्वी मुलांमध्ये भारतीय वंशाची मुले शोधायची !
-(मध्यमगती )अभिजित