नमस्कार,
आपले वास्तव्य कोठे असावे यापेक्षा ते कसे असावे यावर मी (आजच्या घडीला )जास्त भर देतो.
१) मी ज्या स्थिती मध्ये आहे त्यात (विद्यार्थी/ कर्मचारी/ व्यापारी इ.) नेमस्त पणे प्रामाणिकपणे स्वतःचे काम करणे, आणि त्याच वेळेला आजूबाजूच्या लोकांशी सौजन्याने वागणे, त्यांना सर्व प्रकारे मदत सहकार्य करणे.
२) आपल्या देशाची परिस्थिती आणि त्यात आपली देशाला असलेली गरज विचारपूर्वक ओळखून योग्य वर्तन करणे.
इतकेच मला कळते.
( ते करण्याचा आणि भारतीय म्हणून आपली चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा आणि त्यायोगे भारतीय समाजातील चांगुलपणामध्ये आपल्या वागणुकीने भर घालण्याचा अल्प पण प्रामाणिक प्रयत्न मी करतो.)
यामध्ये, आपण भूतलावर कोठे आहोत आणि आज आपण काय करू शकतो त्याचा विचार करून प्रत्येकाने निर्णय घ्यावा.
नियतीचे बोट धरून मुकाट चालणाऱ्या लिखाळाला आपण कोठे राहावे याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नाही. (पण स्वतःची वर्तणूक कशी असावी हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आहे असे वाटते.) आपणापैकी ज्यांना आपण भूतलावर कोठे केंव्हा राहावे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आहे त्यांचे मी अभिनंदन करतो.
आपला नम्र,
--लिखाळ.