मांसाहार करण्याची हिंमत नाही म्हणून शाकाहारी तसे अमेरिका या स्वर्गात काही केल्या जाता येत नसल्याने आम्ही नाईलाजाने भारतात राहतो, म्हणून आम्ही देशभक्त आहोत असे तुम्ही म्हणत आहात. असे धक्कादायक विधान आपण कसे करू शकता एवढेच आम्हाला सांगा.
तुमचा हा निष्कर्ष पाहून धक्का बसायची वेळ आता माझ्यावर आलेली आहे. शाकाहार म्हणजे भारत, मांसाहार म्हणजे परदेश हे मी म्हटले का? शाकाहाराच्या उदाहरणात जो मूळ आणि महत्वाचा मुद्दा होता - फुकटचे भूतदयेचे श्रेय उपटण्याचा - त्याकडे तुमचं दुर्लक्ष होतं आहे असं वाटतंय. ते तुम्ही जाणूनबुजून करीत आहात असे मात्र वाटत नाही.
त्यांचे त्या देशात राहणे अगदी दुरापास्त केले जाते तेव्हा ते लोक तो देश सोडणारच. त्यात विशेष काय? इथे त्या लोकांच्या देशप्रेमाचा प्रश्नच कुठे येतो?
अगदी बरोबर. आता माझा मूळ मुद्दा कृपया पुन्हा वाचाः "जाता जाताः आपण सर्वांनी एक जाणीव ठेवायला हवी, की "परदेशात कायमचे वास्तव्य योग्य की अयोग्य" अशी चर्चा करणे हे आज आपण भारतीय आहोत म्हणून"परवडते" आहे, आणि ही आपली "चैन" आहे. भारताची आज इराक किंवा दार्फ़ूर सारखी प्ररीस्थिती असती, तर ..." परवडले नसते. होय की नाही? आणि देशप्रेमाचा प्रश्नही येत नाही. तुमच्याशी सहमत.
मनातही आणणार नाहीत ... असे तुम्ही लिहिलेत. अहो पण, ही अपवादात्मक परिस्थिती झाली. ती सोडून द्यावी. आपल्या देशात राहणे/परतणे म्हणजे मृत्युला कवटाळणे असल्यावर देशाबाहेर राहणेच योग्य. इथे देशभक्तीचा प्रश्न येतच नाही. परंतु, नितीन यांचा मूळ मुद्दा तो नव्हे. त्यांचा मूळ मुद्दा भारतात परतणे सहजशक्य असतानाही परदेशात राहणारे लोक हा आहे.
"मनातही आणणार नाहीत ..." च्या लगेच पुढची दोन वाक्ये माझ्या जुन्या प्रतिसादातून पुन्हा उधृत करीत आहेः "आणि तशी वेळ आज आपल्यावर नाही म्हणून आपण अशा चर्चा करू शकतो, हा तो मुद्दा आहे (तो चर्चेच्या मूळ मुद्द्यापासून विषयांतर करणारा आहे, हेही मान्य)." याकडे तुमचे चुकून दुर्लक्ष झाले काय? मग "जाता जाता", "अवांतर मुद्दा" असे मी वारंवार म्हणत असताना, पुन्हा तो ऐरणीवर कशासाठी?
असे कसे? तुम्ही वापरलेल्या बहुतांश या शब्दाला काय अर्थ आहे? मी तर म्हणतो ती शुद्ध पळवाट आहे. हे म्हणजे १००० लोकांसमोर उभे राहून "तुमच्यातले बहुसंख्य महामूर्ख नि नालायक आहेत." असे म्हणण्यासारखे झाले. याचा अर्थ काय होतो? आणि तुम्ही मला बहुसंख्यातून का वगळलेत? कृपया असे करू नका. मी बहुसंख्यांमधेच येतो असे माना नि मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
पुन्हा एकवार माझा मुद्दा मांडत आहे. आपल्यातील बहुतांश लोक, हे परदेशस्थ होतात किंवा देशस्थ राहतात, ते देशभक्ति व्यतिरिक्त इतर वैयक्तिक कारणांसाठी. अशा लोकांनी देशभक्तीचे श्रेय लाटू आणू नये असे मला वाटते.
तुम्हाला हे पटते का, ते सांगा.
बाकी सर्व जमले तर सोडून द्या. पळवाट समजा, माझी हार समजा, माझ्या उदाहरणांचा फोलपणा समजा, नाहीतर अजून काही. हे एकमेकांचे प्रतिसाद उद्धृत करून वेगवेगळ्या रंगात रंगवायला मला फार वेळ लागतो हो. परवडत नाही. असे गैरसमजावरून गैरसमज रचत गेलो, तर मूळ मुद्दा बाजूला राहील.
- कोंबडी
टीपः वर "पळवाट समजा", "हार समजा" वगैरे पर्याय मीच दिले आहेत. त्यामुळे पळवाट वाटली, हार वाटली, तर "पळवाट आहे", "हार माना" वगैरे प्रतिसाद कृपया नकोत.