भारतात परत जाणे किंवा न जाणे हा निर्णय प्रत्येक माणसाच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. शिवाय योग्य आणि अयोग्य हया सापेक्ष (रिलेटिव) कल्पना आहेत. कुठल्याच बाजूने एखाद्याच्या परिस्थितीची कल्पना नसताना ते वागणे योग्य/अयोग्य ठरवणे चूक ठरेल.
मीदेखील कधी भारतात परत गेले तर ते आवडते, परवडते म्हणूनच जाईन.
आणि माझेहि माझ्या कुटुंबावर, पेठेवर, गावावर, राज्यावर, देशावर, जगावर भरपूर प्रेम आहे.