अगदी लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य लिहिताना कोणताही मराठी ग्रंथ न वाचल्याची दिलेली कबुली (ज्ञानेश्वरीसकट) ही पण अगदी आताआतापर्यंत संस्कृत व नंतर इंग्रजी या ज्ञानभाषा व मराठी ही सामान्य अडाण्यांची भाषा असल्याच्या समजाला पुष्टी देणारी आहे

विनायकराव - आपल्या या विधानाबाबतची माझी मतभिन्नता येथे देत आहे. आपल्याकडून अधिक माहिती मिळवून ही भूमिका कसोटीस लावण्याची नेहमीप्रमाणेच तयारी आहे.

वरील कारणमीमांसा ताणल्यासारखी वाटते आहे.

टिळकांनी गीतारहस्य लिहिताना ज्ञानेश्वरीचा आधार घेतला नसल्यामागे संस्कृत किंवा इंग्रजी यांना मराठीच्या तुलनेत अधिक वजन देण्याखेरीज इतर कारणे असावीत.

माझ्या वाचनानुसार टिळकांनी गीतारहस्यासाठी ज्ञानेश्वरीचा संदर्भ न घेणे यांत संस्कृत/इंग्रजी यांच्या तुलनेत मराठी ही ज्ञानभाषा नाही ही भावना अगदी असलीच तर फारच हलकीशी असावी.
जाणकारांनी अधिक प्रकाश जरूर टाकावा.

अवांतर - ज्ञानभाषा या नात्याने संस्कृत/इंग्रजी आणि मराठी ह्या कोणत्या स्थानावर आहेत हा स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकतो.