प्रतिसादावरुन आपण खरच हतबुद्ध आहात हे पटले आहे ! !!

अहो ते तर मीच मान्य केले आहे ना. पण जाऊ दे, आपल्या मुद्द्यांना मी उत्तरे देईन, आपण माझे जे मूल्यमापन करू इच्छीत आहात तो आपला प्रश्न आहे. इतर लोक माझे मूल्यमापन त्यांच्या मताने करतील. आणि मी कोणी प्रसिद्ध व्यक्ती नाही की माझे मूल्यमापन इतके महत्वाचे ठरावे.

 "न रडणं हा गुण" अहो त्यातुन गुणवर्णन नव्हे तर त्या प्रसंगाचे गांभिर्य समजते !

मुळातल्या लेखकाने "दोनदाच" असे अभिमानाने लिहिले होते त्यातून हे स्पष्ट दिसत होते की आणखी न रडणे ही मोठी चांगली गोष्ट होती. नाहीतर हिटलरच्या मूल्यमापनात या मुद्द्याला महत्त्वच काय होते?

अगदिच कसे हो तुम्ही असे--विरोध करायच्या तंद्रित सगळे विसरलेले ??

जाऊ दे. या वाक्याला तर्कशास्त्रात "आर्ग्युमेंटम ऍड होमिनम" अशी "फॅलसी" (जाणकारांनी मराठी प्रतिशब्द सुचवावेत) असे म्हणतात. मराठीत आपण याला आतापुरते मुद्द्यावरून गुद्द्यावर असे म्हणू शकू. यात माझी फारशी प्रगती नाही, त्यामुळे मी फक्त मुद्द्यांनाच उत्तरे देऊ शकेन, तेंव्हा क्षमा करा.

 "आश्चर्याच्या धक्क्याचा फायदा होता. दोस्तांची तयारीच नव्हती अजून लढण्याची" ह्यालाच तर म्हणतात अचुक वेळी स्वःतची कुवत वापरणे !

असेल ना. पण मूळ लेखकाने याला "व्यूहरचना आणि दरारा" असे म्हटले होते. ते तसे नाही.

आणि तुम्हि काहितरिच लिहिलय !

मु वरून गु. मी चिडीचूप.

आणि रोमेल आणि बिभिषण एकाच पठडितले असे म्हणा हव तर... !

म्हणा की, माझे काय जाते. पण मूळ लेखकाने याला "माणसे घडविणे" म्हटले होते, ते निश्चितच चूक आहे.

हिटलर नसता तर...एकदा ही जर्मनीला मान वर करता आली नसती बर !!


का बरे? उगीच का? युद्धात हरलेल्या कितीतरी देशांनी नंतर युद्धे न करता किंवा हिंसक राज्यकर्ते न निवडता पुन्हा मान वर केलीच आहे की. जपान, जर्मनी (दुसऱ्या महायुद्धानंतरची), अहो कितीतरी देश आहेत की.

मी ज्या मुद्द्यांना विरोध केला त्यावर न बोलता आपण इतरच मुद्दे उपस्थित केले आहेत.

आपला (नम्र) इहलोकी.