मा. अमोल,
आपल्या भावना अनावर झाल्यात असे दिसतेय...
काहीही झाले तरी स्वतःच्या देशाचा असा "भामटा" म्हणुन उल्लेख करणे चुकीचे आहे.
ते मला फ़ारच खटकले .
मनाला फ़ार वेदना देवुन गेलाय.
देश सर्वांपेक्षा मोठा आहे हे नेहमीच ध्यानात ठेवावे...
माझा परदेशात कायमचे राहणारे यांना विरोध नाही ... (काही लोक परिस्थितीमुळे - नाईलाजाने - इतर काही कारणाने राहतात )
भारता बाहेर कायम राहुनही या देशाशी नाळ न तुटु देणारे माझे मित्र आहेत.
आणि ते देशासाठी खूपच महान कार्य करत आहेत. (उदा. संकरा नेत्रालयम, चेन्नई)
परंतु आपले विधान फ़ारच लागले मनाला.
माफ़ करा, पण आपल्यासारखे (विचारसरणीचे) लोक या देशात होते /आहेत म्हणुनच या देशाची अशी दुरावस्था होतेय.
आपण इथे रहात नाही हे वैयक्तिक माहीतीवरून कळले.
आपल्यासारखे लोक परत नाही आले तर ते चांगलेच असे मला वाटते.
कृपया, पुन्हा असे वक्तव्य करु नये हीच विनंती...
जमल्यास ते वाक्य काढुन टाका.
नोंद घ्यावीः मा. सर्वसाक्षी हे क्रांतिकारकांविषयी लिहितात मनोगतावर. ते लेख वाचत जा. देशासाठी प्राण पणाला लावणारे लोक होउन गेलेत त्यांचे स्मरण करा.
आपले विचार बदलण्यासाठी कदाचित त्याचा फ़ायदा होईल (कदाचित!).
व्यतिथ भारतवासी,
--सचिन