भावनेने ओथंबलेल्या व्यक्तिगत टीकेत मी मांडलेल्या मूळ मुद्द्याकडे मनोगतींनी सोयिस्कर दुर्लक्ष केलं आहे...
भारतात टॅक्स बेस ४.२६ कोटी आहे... म्हणजे १०० कोटी पैकी फक्त साडेचार कोटी कर भरतात. म्हणजे ९५ % लोक देशाला एक दमडी देखिल देत नाहीत पण सोयी मात्र सगळ्या घेतात... त्यातले काही आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतील पण बरेच भामटे पण आहेत. देशात जर बहुसंख्य लोक भामटे असतील तर तो देशच भामटा नाही का? माझ्या भारतातल्या २१ वर्षाच्या अनुभवात (आणि ते हि महाराष्ट्रातल्या, म्हणजे इतर ठिकाणांबद्दल बोलायलाच नको) प्रामाणिकपणे कर भरणारे नगण्य लोकच मला माहीत आहेत. (ऍट सोर्स वाले सोडून) म्हणजे बहुसंख्य कर चुकवे ज्या थोड्या लोकांना कर चुकवण्याचा मार्ग नाही (ऍट सोर्स वाले) त्यांची लुबाडणूक करत नाहीत का?
प्रश्न सोडवण्याची पहिली पायरी प्रश्न आहे हे मान्य करणं असते... मी आणि माझे बरेच मित्र आम्ही अमेरिकेत राहतो कारण इथे सहसा प्रश्न दाखवल्यावर लोक ते देशाच्या प्रतिष्ठेच्या नावाने नाकारत बसत नाहीत तर सोडवायचा प्रयत्न करतात... निदान मुद्द्यावर चर्चा तरी करतात. भामटेगिरी (dishonesty) हा भारतात लोक परत न जाण्याचा महत्वाचा भाग आहे, तसं नाहीच म्हणून आपण एकमेकांच्या मतांकडे दुर्लक्ष करू शकतो किंवा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करु शकतो.