अमोल,

९५ टक्के कराकारणीच्या बाहेर आहेत म्हणजे ते भामटे ठरतात हे अज्ञान.

सगळ्या सोयी घेतात म्हणजे काय घेतात? तुम्ही त्या सगळ्या सोयी घेऊनही उतलातच ना? हे अज्ञान.

या देशात बहुसंख्य लोक भामटे आहेत असे तुमच्याव्यतिरिक्त कुणाला वाटते हो? भारताच्या शत्रुंनाही असे वाटत नाही. हे अज्ञान.

अप्रामाणिकपणाला भामटेगिरी म्हणतात असा समज असणे हे अज्ञान. मराठी भाषेचे अज्ञान. ती मात्र तुम्हाला इथे शिकायला मिळेल.

जे प्रशासन कमीतकमी कराकारणीवर समर्थपणे चालविल्या जाते त्यालाच सुराज्य म्हणतात हे माहीत नसण्याचे अज्ञान.

कम्युनिझम आणि निखळ भांडवलशाही यांच्यातला लोकशाही समाजवादाचा जाणीवपूर्वक स्वीकार केलेला भारत मानवी मूल्ये टिकवून धरण्यात जास्त यशस्वी ठरत असल्याच्या जागतिक ज्ञानाबाबतची अनभिज्ञता हे अज्ञान.

तुम्ही अमेरिकेला (आता ज्या कशाला तुम्ही आपला समजता त्या देशाला) तरी दगा देणार नाही ह्याची खात्री नसण्याचे अज्ञान.

ईश्वरा, त्यांना माफ कर ज्यांना आपण काय करतो, बोलतो ते कळत नाही.