माझा मूळ मुद्दा भारताला भामटा देश ठरवणं नव्हता तर "देशाने काय दिले?" हा होता...
धन्यवाद!
देशातील करव्यवस्था -- तसेच इतरही अनेक व्यवस्था -- कश्या अन्याय्य आहेत हा खरोखरच महत्वाचा मुद्दा आहे. त्यावर स्वतंत्र चर्चाही होऊ शकते.
सदर चर्चेमध्ये ह्या व्यवस्थांचे अधःपतन हे परदेशांत स्थायिक होण्याचे खरोखर कारण आहे की भारत देश (सरकार) म्हणजे लुटण्याचा कारखाना मांडलेला आहे तेव्हा येथून पळ काढलेला बरा हे सांगायचे आहे अश्या अनेक भूमिका समोर येत आहेत. आपली भूमिका दुसऱ्या टोकाची आहे असे आधीच्या प्रतिसादांतून दिसते.
त्यांस -- अर्थात सकारण -- सक्त विरोध आहे इतकेच.