इतर धर्मियांच्या हिंदू धर्मावरील आक्रमणापेक्षा आपण हिंदूनीच आपली संख्या किती कमी करून घेतली आहे याचा विचार करायला हवा.ख्रिश्चनानी विहिरीत पाव टाकून आपल्यातील काही जण बाटले अशी हाळी ठोकली तेव्हा आपल्याच समाजाने त्याना दूर लोटले आणि मग नाइलाजाने त्याना ख्रिस्ती म्हणून जन्म काढावा लागला अर्थात पुढील पिढ्याना दुसरा पर्यायच नव्हता.आपला ३०% समाज आपल्या वागणुकीमुळे बौद्ध झालाय अजूनही  गुरुवायुर सारख्या काही मंदिरात  अहिंदूना प्रवेश नाही.आणि आपण जे स्वतःस हिंदू मानतो त्यातील एक मोठा भाग शिवधर्म स्थापायला निघालाय,त्यांची ही कृती कितपत बरोबर हा वेगळा मुद्दा आहे.पण ते जेव्हा स्वतःस शिवधर्मीय म्हणू लागतील तेव्हा तेवढा हिंदू धर्माचा भाग गेलाच मग हिंदूंची स्थिती ज्यूंसारखीच होईल अशी भीति वाटते. आता जे काही उरलेत त्यातील किती जणाना आपल्या हिंदू धर्माचे आचार विचार संस्कार यांची पूर्ण कल्पना आहे? आपण हिंदू आहोत का यापेक्षा चांगला माणूस आहोत का याचा विचार प्रत्येकाने केल्यास तुमचा धर्म कोणता हा प्रश्नच गौण ठरेल,पण तसे होणे अवघडच दिसते.