एकलव्य, तुम्ही लिहिलेले शेवटचे वाक्यच खरे आहे.
यासंदर्भात माझ्याच "फरक" या प्रतिसादातील वाक्य पुनरावृत्तीचा दोष पत्करून लिहितेः
"माझं म्हणणं असं आहे की भलत्या लोकांचे (जे आपल्या देशातलेही नाहीत - भारताबद्दल ज्यांची मते काय होती ते आपल्याला माहितीही नसताना -) समर्थन करत रहाण्यापेक्षा आपण जमेल तेवढे चांगले प्रशासन आणण्याचा, चांगल्या लोकांना उत्तेजन देण्याचा "खारीचा वाटा" का उचलू नये? "
टग्या, आपले विचार सुसंबद्ध पद्धतीने मांडल्याबद्द्ल धन्यवाद.
सर्वसाक्षी, तुम्ही लिहिले आहेत की
"ज्या न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यावर सुनावणीआधीच निवाडा ठरलेला असतो असे न्यायालय ही तर क्रूर चेष्टा आहे. लाहोर अभियोगाचा निकाल सुनावल्यावर हु. भगतसिंहाने उपस्थित न्यायाधिशांची बोलती आपल्या मुद्देसूद भाषणाने बंद केली होती व भारतीय न्यायाधीश आगाखान यांना पवित्र आसनावर बसून असे अपवित्र कृत्य करण्यापेक्षा त्या आसनाचा त्याग करायचे खडे आवाहन भर न्यायालयात केले होते व शरमेने मान खाली घालून आगाखान उठले होते हे आपणांस माहित नसावे."
इंग्रज चांगले नव्हते/नाहीत, हा तर वादातीत मुद्दा आहे. मी "इंग्रजांचा विषय" या प्रतिसादातील त्यांच्या न्यायसंस्थेबाबतीत, "कशाही का असेना" हे वर्णन त्यामुळेच केले होते. आपण आगाखानांबद्दल जे लिहिले आहे ते मी वाचले नव्हते, या माहितीबद्दल धन्यवाद. पण, इंग्रजांची मी काहीच भलावण केली नव्हती असे मला मनापासून वाटते. मुद्दा फक्त एवढाच आहे की हिटलरने एवढेही केले नसते असे मला म्हणायचे आहे. आणि दुसरे म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल, आपल्या माणसांबद्दल ज्या माणसाची मते आपल्याला माहीत नाहीत, त्याचा एवढा कैवार घेऊन बोलणे मला तरी जड जाईल. याबाबतीत आपलेच खालील वाक्य इंग्रजांचा उल्लेख वगळून वाचावे.
"मात्र आपल्या देशातील अनेकांची बौद्धिक इंग्रजी गुलामगीरी अजूनही कायम आहे, दोष त्यांचा नाही तर ईंग्रजाधिष्ठित व ईंग्रजधार्जिणा इतिहास शिकवणाऱ्या गेल्या ५९ वर्षातील राज्यकर्त्यांचा आहे."
आज आपल्याला आपले प्रश्न सोडवायला आपल्यातीलच एखाद्या चारित्र्यवान माणसाची / त्याच्या कर्तबगारीची आठवण न येता, आपल्या वंशाखेरीज दुसऱ्या सर्वांवर गुलामगिरी लादणाऱ्या एका अपरिचित -परक्या व्यक्तीची आठवण येते आहे ह्याला काय म्हणावे? इंग्रज येण्याआधी आपल्या समाजाची अशीच काहीशी मनोवृत्ती असणार असे वाटते.
सुहासिनी