<"लोअर प्रायॉरिटी". हिटलर ज्यूंच्या संहाराच्या कल्पनेने इतका झपाटलेला होता, की हे बाकी सर्व त्याला त्यापुढे 'किस झाडकी पत्ती' / क्षुद्र / नगण्य होते / त्यांच्याकडे 'बघून घ्यायला' त्याला वेळ नव्हता / कदाचित तितकी गरज वाटली नसावी, इतकेच.> कारणे सागीतलीत, तर्क मांडलेत पण वस्तुस्थिती त्यामुळे नाकारता येत नाही. का घडले नाही हे नंतर पण आधी ते घडले नाही ही वस्तुस्थिती आहे, मान्य करा. उगाच हिटलरने हिंदुस्थनच्या जनतेची कत्तल उडवली असती असे म्हणण्यात काय अर्थ आहे.
बाकी नेताजींविषयी आपल्याला आदर आहे हे ऐकून बरे वाटले. नेहेरूग्रस्तांकडून हे अपेक्षित नव्हते. आनंद झाला.
<मात्र या वीरांना (नेहरूंच्या) सरकारकडून स्वातंत्र्यसैनिक म्हणून मान्यता मिळाली आणि त्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून सरकारी पेन्शनसुद्धा लागू झाले,> साफ चूक! हे विधान धादांत खोटे आहे. स्वातंत्र्यानंतर २५ वर्षे आझाद हिंदच्या कुठल्याही वीराची सरकारने यत्किंचितही दखल घेतली नाही, कुणालाही लष्करांत सामावले गेले नाही. त्यांना स्वातंत्र्यसैनिकांचे मानधन १९७२ साली इंदिराजींच्या कारकिर्दीत मिळाले. जर नेहेरूंच्या कारकिर्दीत मानधन सोडाच साधा स्वातंत्र्यसैनिक म्हणून कुणा आझाद हिंद वीराचा साधा सन्मान नेहेरुंनी केल्याचे एखादे उदाहरण असले तर कृपया दाखवून द्या. न्यायालयात बचावाचे म्हणाल तर एक धूर्त राजकारणी म्हणून नेहेरू उभे राहीले खरे पण संपूर्ण लढा दिला तो बॅ. भुलाभाइ देसाईंनी, नेहेरूंनी नाही, सुरुवातीला नेहेरूंनी बचावाचे देखिल राजकारण करून पाहीले पण ते जमले नाही.