जयंता, तुला अगदी प्रामणिकपणे एक गोष्ट सांगू का रे?  मला कवितेतलं फ़ारसं कळत नाही.  ज्या भावना त्या वेळी मनात येतात त्या उतरवायचा प्रयत्न करते.  नाही म्हणायला यमक जुळवायचा खटाटोपही  करते.  खरं सांगायचं तर मी स्वतःला कवी समजत नाही पण मला कविता खूप आवडतात.  इथे मनोगत, मायबोलीसारख़्या साईटवरच्या तुमच्या सारख्या मान्यवर लोकांकडून खूप काही शिकायला मिळतं म्हणून थोडीशी लुडबूड करते इतकंच. 

आता ह्या कवितेबद्द्ल......... हो, मी थोडी संभ्रमात आहेच.  पण I am born fighter and always positive. म्हणून माझ्या प्रत्येक कवितेच्या शेवटी आशावाद असणारच.  कधी कधी होतं मन निराशावादी......आणि तेच दिसतंय कवितेत. 

चक्रपाणि, तात्या, जयंता, मला आवडेल तुम्हा लोकांशी संवाद साधायला आणि नविन काही शिकायला.

राग अजिबात नाही ........ पण प्रतिक्रिया मात्र नक्की द्याव्यात.

जयश्री