आपले म्हणणे एकदम मान्य. मात्र श्रद्धाच काय, कोणत्याच भावना परिमाणात मोजता येत नाहीत. काही धान्य वाया जाते खरे पण वाहणाऱ्याला एक समाधान तर लाभते. जे पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहेत ते संस्कार एकदम टाकून देणे समाजाला पचणार नाही. मात्र नासाडी टाळता आली तर उत्तम.

जाता आता एक विचार. एका लग्नात अन्नाची जी नासाडी होते ती शहरातल्या सगळ्या देवळात मिळून होत नसेल. अनेक मेजवान्यांत तर आचमने दिर्घकाळ चालतात व अनेक जण अक्षरशः अन्न चिवडून निघून जातात. अतिशयोक्ति सोडा, पण हे कटू सत्य आहे. पूर्वी मुंबईत एक पारशी कंत्राटदार स्वखर्चाने रात्री काही कार्यालयांवर जाऊन उरलेले अन्न गोळा करून ते रस्त्यावरच्या निराधार गोरगरीबाना वाटत असे.

ज्याना भरपेट जेवायला मिळताय त्यांना बोलावून आग्रहाने जेवायला घालण्या ऐवजी ते जेवण जर आपला आनंद साजरा करण्यासाठी भूकेलेल्यांना दान केले तर? पण असे लाखात एक दिसत नाही. मग समाज श्रद्धा कसा सोडणार? तो खरा वा खोटा कसाही असला तरी मानसिक आधार असतो. माणूस देवाला जे काही वाहतो ते तो देवासाठी करत नसून स्वतःसाठीच करत असतो.