कुशाग्र, तुमचा लेख सुंदर आहे, तुमच्या मनातली तळमळ आम्हाला जाणवली.

मला वाटतं या गोष्टीविषयी प्रत्येकाने गांभीर्याने विचार करायची वेळ आता आली आहे. मराठी बोलणे, लिहिणे, वाचणे हे मागासलेपणाचे, जुनेपणाचे लक्षण मानले जात आहे. हिंदीभाषिक येथे येऊन मराठी शिकण्याऐवजी त्यांची हिंदी आपल्यावर थोपवीत आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या रोडावत आहे. मराठी मासिके, पुस्तके, वर्तमानपत्रे दिवसेंदिवस इंग्रजाळलेली होत आहेत. मराठी शब्द, म्हणी, वाक्‌प्रयोग यांचा वापर तर थांबल्यासारखाच आहे म्हणाना !

मात्र याबाबत सरकारला दोष देण्यापेक्षा आपणच काहीतरी करणे योग्य व सयुक्तिक ठरेल असे मला वाटते.चला आपण -

शक्य होईल तिथेतिथे मराठी बोलूयात.
मुलांना मराठी माध्यमात शिकवूयात.
मराठी वर्तमानपत्रे वाचूयात.
निरोप देताना, कुठे आपली प्रतिक्रिया लिहिताना मराठीच लिहूयात.
मराठी पुस्तके विकत घेऊन वाचूयात.
मराठीचा अभिमान व मराठी लोकांच्या उत्कर्षाची चाड असणाऱ्या पक्षांनाच आपली मते देऊयात.
जिथे शक्य असेल तिथे मराठी भाषेचा वापर करण्याबाबत जनजागृती करूयात.

आपण काय म्हणतां?

एक वात्रट