या पद्धतीची फलज्योतिषाशी गल्लत न करता स्वतंत्रपणे अभ्यास का केला जाऊ नये? नक्षत्रांशी संबंधित वाहनांवरून गेल्या काही वर्षांच्या पावसाच्या नोंदी तपासून का बघू नयेत? तसेच आगामी दिवसातील वाहनांनुसार पाऊस पडतो का हे ही दिसेलच. ही पद्धत फक्त महाराष्ट्र वा भारतालाच लागू होते की संपूर्ण जगाला लागू पडते यावर संशोधन का होऊ नये?
असे संशोधन जरूर व्हावे असे वाटते. "जुने ते सर्वच खोटे" आणि "जुने ते सर्वच सोने" या दोन्ही टोकाच्या भूमिका न घेता, वैज्ञानिक दृष्टिकोनातून या आणि अश्या पद्धतींचे परीक्षण व्हावे असे वाटते. असे केल्याने एखाद्या पद्धतीत जर का तथ्य असेल तर ते जगासमोर येईल आणि तथ्य नसेल तर त्या पद्धतीचा फोलपण सिद्ध होईल.