आम्ही महाविद्यालयात असताना जाणीवपूर्वक असे बोलत असू.( यावरून आठवले, मराठी व्याकरणही हळूहळू कसे लुप्त होते आहे पहा. परवा मी एका मुलाला विचारले "मी लहानपणी आंबा खात असे" हे वाक्य मी च्या जागी तू हा कर्ता वापरून कसे करशील? तर तो म्हणाला "तू लहानपणी आंबा खात होतास"! आता बोला! 'चाणाक्ष' मनोगतींना बरोबर उत्तर माहिती असेलच, त्यामुळे मी त्यांच्या बुद्धीमत्तेचा उपमर्द करू इच्छीत नाहे)

खरंच, कसं होईल हो ते वाक्य? मी असे, आम्ही असू, तू ? (अस???) तुम्ही/आपण ? (असा???) तो/ती/ते असे, ते/त्या/ती असत.

- टग्या (बुचकळ्यात)

अवांतर: 'उतमात घालणे' म्हणजे नेमके काय हो? याचा 'उतू नको, मातू नको' मधल्या उतण्यामातण्याशी काही संबंध आहे का? जसे, अन्न वाया घालवणे? 'अन्नाचे मातेरे करणे' असाही एक शब्द आठवतो.