ही बातमी आहे की व्यापाऱ्यांना भाववाढ करण्यास केलेली भरघोस मदत आहे?
वर्तमानपत्रे कोण चालवते, त्यांचे कोणाकोणाशी लागेबांधे आहेत हे तसे सर्वश्रुतच आहे. शिवाय ती जाहिरातींवर चालतात. तेव्हा अश्या नि तश्या जाहिराती कराव्या लागतात. काय करणार.
या बातमीतल्या वार्ताहराने भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत भाज्या नेण्याचे गणित केले असावे. तसे केल्यास साधारण ३ ते ४ रू भाववाढ मिळेल. आणखी मोठ्या आकड्यांसाठी विमानातून दुसऱ्या देशातून आणलेल्या भाज्याही धरल्या असाव्यात बहुधा.